थोडक्यात माहिती...१) जळगाव जिल्ह्यात उडीद पिकाची पेरणी यंदा कमी झाली असून कमी पावसामुळे पीक पिवळे पडून वाढ खुंटली आहे.२) जुलै-ऑगस्टमध्ये पावसाची ओढ असल्याने अनेक भागात शेंगा लागलेल्या नाहीत व उत्पादन 50–60% घटण्याची शक्यता.३) हलक्या जमिनीत पिकाला सर्वाधिक फटका बसला असून काही शेतकऱ्यांना पीक उपटण्याची वेळ आली आहे.४) फुपनगरी, कानळदा, खेडी खुर्द, आसोदा, ममुराबाद आदी भागात गंभीर नुकसान झाले आहे.५) शेतकऱ्यांची मागणी – तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी..Jalgaon News: जळगाव जिल्ह्यात उडदाची पेरणी यंदा घटली आहे. यातच पीक कमी पावसाने खराब झाले आहे. त्याची वाढ खुंटली असून, पीक पिवळे पडत आहे. पिकाची आवश्यक वाढही काही भागात झाली नाही. कारण पाऊस सुरुवातीपासून कमी आहे. अनेक भागांत पिकास शेंगाही लागलेल्या नाहीत. उडदाची पेरणी मागील हंगामात घटली होती. .तसेच ओल्या दुष्काळी स्थितीने अनेक शेतकऱ्यांचे उडीद पीक हातचे गेले होते. मागील वेळेस जून व ऑगस्टमध्ये पाऊस होता. यात पिकास फटका बसला होता. यंदा पाऊस वेळेत आला. पेरण्यांना वेळेत सुरुवात झाली. उडदाची पेरणीही वेळेत झाली. त्यावर पाऊस आल्याने उगवणही जोमात होती. परंतु जुलै व ऑगस्टमध्येही कमी पाऊस आहे. यामुळे उडीद पिकाला फटका बसला आहे. .Moong Urad Crop: मूग आणि उडीद पिकाचे व्यवस्थापन कसे करावे?.पावसाची ओढपावसाने ओढ दिल्याने हलक्या जमिनीत पिकाची कमी वाढ झाली आहे. त्यास शेंगा, फुले लगडलेली नसल्याने उत्पादनाला मोठा फटका बसल्याची स्थिती आहे. तर अनेक शेतांत पीक पिवळे पडले असून, त्यावर नांगर फिरवावा लागू शकतो, अशी स्थिती आहे. जिल्ह्यात उडदाची पेरणी जळगाव तालुक्यात अधिक आहे. या पाठोपाठ चोपडा, यावल, अमळनेर, चाळीसगाव, भडगाव, पाचोरा भागात उडीद पीक आहे..जिल्ह्यात उडदाची पेरणी सुमारे १३ हजार हेक्टरवर झाली आहे. पेरणी घटली, त्यात कमी पावसाने पिकाची हानी झाल्याने उडदाचे उत्पादन ५० ते ६० टक्के कमी होईल, अशीही स्थिती आहे. जळगाव तालुक्यातील फुपनगरी, वडनगरी, खेडी खुर्द, विदगाव, भादली बुद्रूक, आसोदा, ममुराबाद, तुरखेडा, आव्हाणे, कानळदा, कडगाव, शेळगाव, भोलाणे आदी सर्वच भागात उडीद पिकाची हानी झाली असून, पीक पिवळे पडून नुकसान होत आहे. पीक माना टाकू लागले आहे. .Soybean Crop Loss : चार एकर सोयाबीनवर फिरविला रोटावेटर.पीक उपटण्याची वेळ अनेक शेतकरी पीक हातचे गेल्याने त्याचे अवशेष गाडण्याची कार्यवाही सुरू करतील. जळगाव तालुक्यातील फुपनगरी, खेडी खुर्द, आव्हाणे व लगत अशी कार्यवाही शेतकरी करण्याचे नियोजन करीत आहेत. .पंचनामे कराकमी पाऊस व अन्य समस्यांमुळे उडीद पिकाचे नुकसान होत आहे. पिकास फुपनगरी, कानळदा भागात शेंगा लागलेल्या नाहीत. खेडी खुर्द, आसोदा, ममुराबाद, विदगाव व अन्य भागांत पीक माना टाकत आहे. फुलगळ झाली आहे. यामुळे पिकाचे पंचनामे करून नुकसान भरपाई दिली जावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. जिल्ह्यात सुमारे आठ ते १० हजार हेक्टरवरील उडीद पिकाची अतोनात हानी झाल्याचा अंदाज आहे. .उडीद पिकाची कमी पावसाने किंवा पावसाने ओढ दिल्याने मोठी हानी झाली आहे. आमच्या भागात पिकात फुलगळ, शेंगा न लागणे, पीक पिवळे पडणे व अन्य समस्या दिसत आहेत. याबाबत पंचनामे करून नुकसानग्रस्तांना भरपाई दिली जावी, अशी मागणी आहे. - सी. आर. जाधव, शेतकरी, फुपनगरी (ता. जळगाव).वारंवार विचारले जाणारे प्रश्न...१) जळगाव जिल्ह्यात उडीद पेरणी किती झाली?यंदा सुमारे 13 हजार हेक्टरवर उडीद पेरणी झाली आहे.२) उत्पादन किती टक्के घटेल अशी शक्यता आहे?अंदाजे 50 ते 60 टक्के उत्पादन घटेल.३) उडीद पिकाचे प्रमुख नुकसान कोणत्या भागात झाले?फुपनगरी, खेडी खुर्द, कानळदा, आसोदा, ममुराबाद आदी भागात.४) पिकात कोणत्या समस्या दिसत आहेत?फुलगळ, शेंगा न लागणे, पीक पिवळे पडणे आणि माना टाकणे.५) शेतकऱ्यांची प्रमुख मागणी काय आहे?पंचनामे करून नुकसानग्रस्तांना भरपाई द्यावी..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.