
Amravati News: गेल्या दोन दिवसांत झालेल्या पावसाने धारणी तालुक्याला सर्वाधिक फटका बसला आहे. ३०५ घरांची अशंतः पडझड झाली असून, ४२८ हेक्टर क्षेत्रातील उन्हाळी मूग व केळीचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात या पावसाने ५१८ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल महसूल प्रशासनाने दिला आहे.
१६ ते १८ मे या कालावधीत जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. जोराच्या वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात झालेल्या या पावसाने कांदा, उन्हाळी मूग, संत्रा, लिंबू व केळी या फळपिकांचे नुकसान झाले आहे. जिल्हा महसूल विभागाकडून करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणात अचलपूर, धारणी, अंजनगावसुर्जी, चिखलदरा, अमरावती व वरुड तालुक्यात नुकसान झाल्याचे अहवालात म्हटले आहे.
५५ गावांतील पिके बाधित झाली आहेत. सर्वाधिक नुकसान धारणी तालुक्यात झाले असून ३९ गावांतील ४२८ हेक्टरवरील उन्हाळी मूग व केळीचे अपरिमित नुकसान झाले आहे. अचलपूर तालुक्यातील १५ व अमरावती तालुक्यातील १३.२० हेक्टरवरील कांदा ओला झाल्याने सडू लागला आहे.
अकरा मोठे पशू दगावले
पावसाचा कहर पशूंवरही झाला असून, १५ मोठ्या व सहा लहान पशूंचा मृत्यू झाला आहे. धारणी तालुक्यातील ११, अंजनगावसुर्जीतील ३ व तिवसा तालुक्यातील एक, अशा अकरा मोठ्या जनावरांचा, तर धामणगावरेल्वेतील एक व धारणीतील पाच लहान पशूंचा मृत्यू झाला आहे.
धारणी तालुक्यातील ३०५ घरांची अंशतः पडझड
पावसासोबत जोराचा वाराही असल्याने घरांची पडझड मोठ्या प्रमाणावर झाली आहे. घरांचे अंशतः नुकसान होण्याचे प्रमाण अधिक आहे. धारणी तालुक्यातील ३०५ घरांची अंशतः व एका घराची पूर्णतः पडझड झाली आहे. चिखलदरा तालुक्यातील १३६, धामणगावरेल्वे १०, अंजनगावसुर्जी ७, अमरावती २ व वरुड तालुक्यातील ३४ घरांची अंशतः पडझड झाली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.