Climate Change : हवामान बदलाचा शेतीवर परिणाम?  सरकारने लोकसभेत दिली धक्कादायक माहिती?

Impact of Climate Change on Agriculture : केंद्र सरकारने हवामान बदलाचा शेतीवर परिणाम होत असल्याची धक्कादायक माहिती दिली आहे. तर हवामान बदलामुळे खरीप हंगामातील तांदूळ, गहू आणि मक्याच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. 
Climate Change
Climate change Agrowon
Published on
Updated on

Pune News : आधुनिक शेती आणि खतांच्या वाढत्या वापरामुळे शेतीवर विपरित परिणाम होत आहेत. याचदरम्यान हवामान बदलामुळे देशातील कृषी उत्पादकतेवर परिणाम होण्याची शक्यता असल्याची धक्कादायक माहिती केंद्रीय कृषी राज्यमंत्री भगीरथ चौधरी यांनी संसदेत दिली आहे. देशातील शेतीवर हवामान बदलाचा कोणता परिणाम होतो असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्या प्रश्नावर दिलेल्या लेखी उत्तरात चौधरी यांनी ही माहिती दिली आहे. चौधरी यांनी सांगितले की, एकात्मिक संगणक सिम्युलेशन मॉडेलिंग अभ्यासातून असे दिसून आले आहे की, पावसावर आधारित तांदूळ उत्पादनात २०५० पर्यंत २० टक्के तर २०८० पर्यंत ४७ टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे विना पावसाच्या पाण्यावर उत्पादीत होणारा तांदूळ २०५० पर्यंत ३.५ टक्के तर २०८० पर्यंत ५ टक्के घट होईल अशीही चिंता व्यक्त करण्यात आली आहे. 

तसेच चौधरी यांनी यावेळी हवामान बदलाच्या प्रभावामुळे गव्हाचे उत्पादनही घटण्याची शक्यता व्यक्त केली आहे. २०५० मध्ये गव्हाचे उत्पादन १९.३ टक्के आणि २०८० मध्ये गव्हाचे उत्पादन ४० टक्क्यांनी घटण्याची शक्यता असल्याची माहिती चौधरी यांनी दिली. गव्हाबरोबरच मक्याच्या उत्पन्नात देखील घट होण्याची शक्यता आहे. २०५० मध्ये १८ टक्के आणि २०८० मध्ये २३ टक्क्यांनी मका उत्पन्नात घत होईल असे अभ्यासातून पूढे आले आहे. मात्र २०३० मध्ये सोयाबीनचे उत्पादन ३ ते १० टक्के आणि २०८० मध्ये १४ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज अभ्यासातून वर्तवण्यात आल्याचे चौधरी यांनी सांगितले. 

Climate Change
Climate Change : जागतिक तापमान वाढीमुळे कीड, रोगांच्या प्रादुर्भावात बदल

शेतकऱ्यांसाठी प्रगत कृषी तंत्रज्ञान 

लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांमध्ये प्रगत कृषी तंत्रज्ञान आणि पद्धतींचा वापर करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी सरकारल प्रयत्नशिल आहे. यासाठी सरकार प्रगत कृषी तंत्रज्ञान आणि पद्धतींना प्रोत्साहन देत आहे. यामध्ये ड्रोन, हवामानास अनुकूल वाण, एकात्मिक शेती प्रणालींचा समावेश आहे. तसेच मॉडेल्स, सूक्ष्म सिंचन, अचूक शेती, मातीचे संवेदक, जैव-फोर्टिफाइड वाण आणि डिजिटल मार्केटिंगवर देखील भर दिली जात आहे. चौधरी यांनी ही माहिती एका वेगळ्या प्रश्नाला उत्तर देताना दिली आहे. 

Climate Change
Climate Change : हवामान बदलास सामोरे जाताना...

शेतकऱ्यांना थेट मदत 

केंद्र सरकार शेतकऱ्यांना थेट मदत करत असून पीएम किसान सन्मान निधी योजनेतून अधिक शेतकऱ्यांना मदत आर्थिक मदत केल्याचे चौधरी यांनी सांगितले. आतापर्यंत ११ कोटींहून अधिक शेतकऱ्यांना १७ हप्त्यांमध्ये ३.२४ लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम थेट थेट बँक खात्यांमध्ये हस्तांतरित केल्याची माहिती चौधरी यांनी दिली. तसेच चौधरी यांनी यावेळी आयकर भरणारे शेतकरी या योजनेसाठी पात्र नाहीत असेही सांगितले. 

यावरून दिल्लीच्या क्लायमेट ट्रेंड्सच्या संचालक आरती खोसला यांनी, विकसीत भारत आणि भारताच्या पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे ध्येयात कृषी क्षेत्राची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे सांगितले. तसेच जर भारताला आपले ध्येय गाठायचे असेल तर हवामान बदलांकडे अधिक गंभीरतेने पाहायला हवे.  अन्न व्यवस्थेतील सुधारणांनाकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे खोसला म्हणाल्या. अनियमित पर्जन्यमानामुळे दुष्काळ आणि महापूर या दोन्ही गोष्टींमुळे हवामानातील बदलांचा पीक उत्पादन, पीक क्षेत्र आणि लागवडीच्या पद्धतींवर लक्षणीय परिणाम होईल असेही खोसला यांनी सांगितले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com