Maharashtra Politics News : मुख्यमंत्री शिंदे(CM Eknath Shinde) भाषण वाचतात पण शेतकऱ्यांनी रक्तानं लिहिलेलं पत्र वाचता येत नाही, असा टोला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उद्धव ठाकरे (Uddhav Thackery) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लगावला.
राज्यातील कांद्याचे दर पडल्यानंतर शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री शिंदेंना रक्तानं पत्र लिहिले होते. त्याचा संदर्भ देत ठाकरे यांनी शिंदेंवर टीकास्त्र सोडले. ते नाशिक जिल्ह्यातील एम.एस.जी.कॉलेज ग्राउंड मालेगाव सभेमध्ये रविवारी (ता.२६) संध्याकाळी बोलत होते.
मुख्यमंत्री शिंदेंवर टीका करताना ठाकरे म्हणाले,"मुख्यमंत्र्यांच्या वावरात दोन दोन हॉलीपॅड आहेत. शेतकऱ्यांनी रक्तानं लिहिलेलं पत्र त्यांना वाचता येत नाही."
पुढे त्यांनी राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचाही समाचार घेतला. ठाकरे म्हणाले, "कृषिमंत्र्यांना दिव्यदृष्टी प्राप्त झाली आहे. ते अंधारात नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करतात," असा टोला ठाकरे यांनी लगावला.
सत्तारांनी अलीकडेच नाशिक जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली. यावेळी अंधारात पाहणी केल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली होती. तसेच "आमचं कृषिमंत्र्यांनी ऐकलं नाही, त्यांचंच सांगत बसले," अशी नाराजी शेतकऱ्यांनी व्यक्त केली होती. त्याच पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी सत्तारांचा समाचार घेतला.
दरम्यान, राज्यातील शेतकऱ्यांना वादळी पाऊस आणि गारपीटीचा तडाखा बसला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधत ठाकरे यांनी शेतमालाचे भाव पडल्याचा प्रश्नही उपस्थित केला.
त्यावरून राजकीय फटकेबाजी ठाकरे यांनी केली. तसेच महिलांना शिवीगाळ करणारे सत्तार मंत्रीमंडळात कसे? असा प्रश्न ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.