Palghar News: पालघर जिल्ह्यात भातशेती खरिपातील महत्त्वाचे पीक आहे. अशातच शेतकरी भातपिकाच्या जोडीला तूर लागवड करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पिकांबरोबर बांधावरील तुरीपासून दुहेरी उत्पन्नाचा फायदा होत आहे. .परतीच्या पावसाने भातपिकाचे नुकसान होत आहे. त्यामुळे अतिरिक्त उत्पादन, उत्पन्न मिळावे या उद्देशाने कृषी विभागामार्फत खरीप हंगामात बांधावर तूर लागवडीची योजना कार्यरत केली आहे. त्याचा चांगला फायदा शेतकऱ्यांना होत आहे. परिणामी, तूर लागवड क्षेत्र वाढले तसेच रोजच्या आहारात मुबलक प्रमाणात प्रथिनांचा स्रोत असलेल्या कडधान्यांचा समावेश झाल्याने आदिवासी भागातील कुपोषणमुक्तीसाठी बांधावरील तूर उपयुक्त ठरत आहे. तूर उत्पादनातून शेतकरी वर्षभर खाण्यापुरती डाळ घरी ठेवून उर्वरित विक्री करून चार पैसे मिळवू शकतो..Tur Crop: बळीराजाला तूर पिकाचा आधार.४२६ किलो बियाण्याचे वाटपडहाणू तालुक्यात खरीप हंगामात कृषी विभागाच्या माध्यमातून ४२६ किलो तूर बियाण्याचे वाटप झाले आहे, तर एक हजार ५४० शेतकरी योजनेत सहभागी झाले असून, ६८१.६ हेक्टर क्षेत्र कृषी विभागाच्या माध्यमातून तूर लागवड केल्याचे कृषी अधिकारी डॉ. जगन सूर्यवंशी यांनी सांगितले..Tur Cultivation : तूर लागवड, जमीन व्यवस्थापनावर मार्गदर्शन.भातपिकासोबत शेताच्या बांधावर किंवा पडीक माळरानावर तुरीची लागवड केली, तर वर्षभर स्वतःसाठी पुरेल एवढे तुरीचे उत्पन्न मिळू शकते. या योजनेमुळे शेतकऱ्यांनी दुहेरी उत्पन्न घ्यावे.- किशोरी विशे, उपकृषी अधिकारी, डहाणू.पावसामुळे रोपांवर परिणाम झाला असला तरी तुरीच्या लागवडीपासून यंदा १०० ते १३० किलो उत्पन्न मिळेल. पुढील वर्षी शेताच्या बांधावर ही तूर लागवड करणार आहे.- रेखा डोंगरकर, शेतकरी, डहाणू.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.