मयूरा बिजलेMonsoon Traditional: पावसाळा सुरू झाला, की बाजारात विविध प्रकारच्या छत्र्या, रेनकोट्सची रेलचेल दिसते. छत्र्यांचे रंग, आकार आपल्याला सुखावतात. रेनकोटला देखील रंगानुसार पसंती असते. मात्र त्याहून देखील भारी आकाराच्या, अंगभर बसू शकतील अशा छत्र्या भारतातील अनेक भागांत आज वापरण्यात येतात. आम्ही पर्यावरण संरक्षण करतो असा बडेजाव त्यात नसतो. .वर्षानुवर्षे स्थानिक भागात पडणाऱ्या पावसाच्या प्रमाणाच्या अंदाजानुसार आणि तिथे मिळणाऱ्या स्थानिक संसाधनांनुसार त्या बनवल्या जातात. बरे, त्यांचे नाव फक्त छत्री असे नसते. स्वतःच्या संस्कृतीला जपणारी त्यांची नावेही इरले, घुंघू, कोफ्री, हेप्लांग, येम्पाक, सिक्सिल अशी छान आहेत. कोकणात मुसळधार पाऊस पडतो. या पावसातच पाण्यात वाकून भात लावण करावी लागते. वरून मुसळधार पाऊस आणि खालून पायाला गारवा असला तरी ही कोकणी माणसे हसतखेळत गाणी म्हणत काम करताना दिसतात. .Kurmar Community: कुरमार : कुरी पाळणारे भटके पशुपालक.अशा वेळी पावसापासून त्यांचे संरक्षण करते ते इरले. पाऊस आणि थंडी यापासून संरक्षक कवचासारखी ही इरली काम करतात. ती अंगावर असताना पावसाचा गारवा न जाणवता आत असलेल्या घोंगड्यामुळे उबदारपणा मिळतो.पूर्वी शेतकरी, महिला, शेतमजूर इरल्यांचा वापर सर्रास करत असत. अलीकडे ही इरली बांबू आणि प्लॅस्टिकचा कागद वापरून केलेली दिसतात..घुंघूचे वैशिष्ट्यजसे आपले इरले तसे झारखंडमधील असुर आदिवासी समाजात वापरले जाणारे ‘घुंघू. ही केवळ पावसापासून बचाव करणारी छत्री नाही. तर त्यांच्या पारंपरिक ज्ञानाची, पर्यावरणाशी असलेल्या नात्याची आणि शाश्वत जीवनशैलीची ती साक्ष आहे. झारखंडमधील गुमला जिल्ह्यातील कुजाम गावातील असुर समाजातील महिला आजही जंगलातून मालू या वेलीची मोठी पाने गोळा करून घुंघू तयार करतात. .या वेलीची पाने आकाराने मोठी, मजबूत आणि पाण्याला प्रतिरोधक असतात. त्यापासून घुमटाकार छत्री तयार केली जाते. एक घुंघू तयार करण्यासाठी तब्बल एक हजार ते दोन हजार पाने लागतात. त्यासाठी दोन ते तीन दिवसांची मेहनत घ्यावी लागते. पूर्वी प्रत्येक घरात ही कलाकृती बनवली जायची. दुष्काळाच्या काळात महिला शेजारच्या गावात विकत असत. त्या बदल्यात धान्य मिळवत असत. म्हणजेच घुंघू केवळ उपयोगी वस्तू नसून ग्रामीण अर्थव्यवस्थेचाही भाग होता..छत्री निर्मितीतील रंजकतामेघालयातील खासी समाजात बांबू आणि स्ट्यूच्या पानांपासून तयार करण्यात येणाऱ्या पारंपरिक छत्रीला कनुप म्हणतात. ही छत्री ईशान्य भारतीय समाजांमध्ये वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाते. बोडो समाज कोफ्री म्हणते. तांग्सा जमात हेप्लांग म्हणतो. मणिपूर मैतेई येम्पाक तर मिझो त्याला सिक्सिल म्हणतात. नावातच फरक नाही तर या छत्र्या बनवण्यासाठी बांबू, स्थानिक झाडांची पाने आदी उपयोगी घटक छत्र्या बनविण्यासाठी वापरले जातात. मेघालयातल्या अति पावसापासून संरक्षण करणारी खूप बांबूपासून बनविलेली असते. तर ओडिशाची पाखिया छत्री ताडाच्या पानांपासून तयार केली जाते. संथाली छत्री बांबूपासून बनवितात. तर तुकारू झारखंडमधील पारंपरिक छत्रीही बांबूपासून बनवितात. करंबू तुळुनाडू कर्नाटकची छत्री, तर मलबार ओलक्कडू केरळच्या मलबार भागात ताडाच्या पानांपासून तयार केली जाणारी पारंपरिक छत्री आहे..Tribal Women Success Story: आदिवासी थारू महिलांची उत्पादने पोहोचली जगभरात.संस्कृतीबाबत सजग होण्याची गरजहवामान बदल, पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकास यांची चर्चा जगभर होत असताना आपल्याच संस्कृतीकडे सजगपणे पुन्हा एकदा बघण्याची गरज आहे. घुंघू किंवा इरले, हा पर्यावरणपूरक जीवनशैलीचा उत्कृष्ट नमुना आहे. भारतीय शेती आणि ग्रामीण जीवनात अशा अनेक लोकपरंपरा आणि स्थानिक तंत्रज्ञान दडलेले आहे. त्यांचे केवळ दस्तऐवजीकरण नव्हे, तर संवर्धन आणि प्रसार करणे ही काळाची गरज आहे. कारण घुंघू, हेप्लांग, येम्पाक, सिक्सिल सारख्या वस्तूंमध्ये निसर्गाशी सुसंवाद साधत जगण्याचे शहाणपण दडलेले आहे. तंत्रज्ञानाच्या युगातही हे स्थानिक शाश्वत ज्ञान आणि परंपरा आपल्याला संदेश देते. शाश्वत विकासाचा मार्ग अनेकदा जंगलातूनच जातो... पुढे जाताना पाठीमागे पाहा जरा...हा तो संदेश असतो.छत्री निर्मितीतील रंजकता.मेघालयातील खासी समाजात बांबू आणि स्ट्यूच्या पानांपासून तयार करण्यात येणाऱ्या पारंपरिक छत्रीला कनुप म्हणतात. ही छत्री ईशान्य भारतीय समाजांमध्ये वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाते. बोडो समाज कोफ्री म्हणते. तांग्सा जमात हेप्लांग म्हणतो. मणिपूर मैतेई येम्पाक तर मिझो त्याला सिक्सिल म्हणतात. नावातच फरक नाही तर या छत्र्या बनवण्यासाठी बांबू, स्थानिक झाडांची पाने आदी उपयोगी घटक छत्र्या बनविण्यासाठी वापरले जातात. मेघालयातल्या अति पावसापासून संरक्षण करणारी खूप बांबूपासून बनविलेली असते. तर ओडिशाची पाखिया छत्री ताडाच्या पानांपासून तयार केली जाते. संथाली छत्री बांबूपासून बनवितात. तर तुकारू झारखंडमधील पारंपरिक छत्रीही बांबूपासून बनवितात. करंबू तुळुनाडू कर्नाटकची छत्री, तर मलबार ओलक्कडू केरळच्या मलबार भागात ताडाच्या पानांपासून तयार केली जाणारी पारंपरिक छत्री आहे..हवामान बदल, पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकास यांची चर्चा जगभर होत असताना आपल्याच संस्कृतीकडे सजगपणे पुन्हा एकदा बघण्याची गरज आहे. घुंघू किंवा इरले, हा पर्यावरणपूरक जीवनशैलीचा उत्कृष्ट नमुना आहे. भारतीय शेती आणि ग्रामीण जीवनात अशा अनेक लोकपरंपरा आणि स्थानिक तंत्रज्ञान दडलेले आहे. त्यांचे केवळ दस्तऐवजीकरण नव्हे, तर संवर्धन आणि प्रसार करणे ही काळाची गरज आहे..कारण घुंघू, हेप्लांग, येम्पाक, सिक्सिल सारख्या वस्तूंमध्ये निसर्गाशी सुसंवाद साधत जगण्याचे शहाणपण दडलेले आहे. तंत्रज्ञानाच्या युगातही हे स्थानिक शाश्वत ज्ञान आणि परंपरा आपल्याला संदेश देते. शाश्वत विकासाचा मार्ग अनेकदा जंगलातूनच जातो... पुढे जाताना पाठीमागे पाहा जरा...हा तो संदेश असतो.मेघालयातील खासी समाजात बांबू आणि स्ट्यूच्या पानांपासून तयार करण्यात येणाऱ्या पारंपरिक छत्रीला कनुप म्हणतात. ही छत्री ईशान्य भारतीय समाजांमध्ये वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाते. बोडो समाज कोफ्री म्हणते. तांग्सा जमात हेप्लांग म्हणतो. मणिपूर मैतेई येम्पाक तर मिझो त्याला सिक्सिल म्हणतात. नावातच फरक नाही तर या छत्र्या बनवण्यासाठी बांबू, स्थानिकछत्री निर्मितीतील रंजकता.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.