Yavatmal News : तुरीच्या दरात वाढ झाल्याने बाजार समितीत शेतमालाची आवक वाढली आहे. समितीच्या शेडमध्ये व्यापाऱ्यांचाच माल ठेवण्यात येतो. शेतकऱ्यांना माल ठेवायला जागाच मिळत नसल्याने जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष श्याम जयस्वाल यांनी बुधवारी (ता.७) सायंकाळी बाजार समितीत धडक दिली. या वेळी जयस्वाल व बाजार समितीचे उपसभापती किशोर इंगळे यांच्यात शाब्दिक चकमक झाली.
खरीप हंगाम तोंडावर आला आहे. शेतकऱ्यांना बियाणे खरेदीसाठी पैशांची आवश्यकता आहे. दरम्यान, तुरीला समाधानकारक भाव मिळत असल्याने बाजार समितीत आवक वाढली आहे. मात्र या ठिकाणी असलेल्या शेडमध्ये व्यापाऱ्यांचाच माल ठेवला जातो.
शेतकऱ्यांना माल ठेवण्यासाठी जागा मिळत नाही. अनेकदा शेतकऱ्यांना शेतीमाल उघड्यावर ठेवण्याची वेळ येत असल्याची ओरड ऐकायला मिळते.
पाऊस आल्यास शेतकऱ्यांच्या मालाची नासाडी होते. यासंदर्भात माहिती मिळताच श्याम जयस्वाल यांनी बाजार समितीत धडक देत प्रशासनाला जाब विचारला.
शेतकऱ्यांना पिण्यासाठी पाणी नाही, झोपण्यासाठी जागा नाही, अशी प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. त्यामुळे इंगळे व जयस्वाल यांच्यात काहीवेळ शाब्दिक चकमक झाली. आठ दिवसांत शेतकऱ्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन उपसभापती इंगळे यांनी दिले. त्यानंतर काही वेळासाठी निर्माण झालेला तणाव निवळला.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.