Fertile Silt From Dams : शेतात नवी माती टाकायची आहे? शासन देतं अनुदान; पाहा कोणती आहे योजना? 

Fertile Silt From Dams Scheme : अनेक कारणांनी आपल्या शेतातील मातीची सुपीकता ही कमी होते. याचा थेट परिणाम हा उत्पादन क्षमतेवर होतो. यामुळे शेतकऱ्यांकडून शेतात काही कालावधीनंतर नवीन माती टाकली जाते. आता यासाठी शासनाची एक योजना असून सरकारकडून अनुदानही मिळते...
Fertile Silt From Dams
Fertile Silt From DamsAgrowon
Published on
Updated on

Pune News : आपण आपल्या शेताला देणारे पाणी हे पावसापासून मिळते. तर पावसाळ्यानंतर हेच पाणी धरण, नदी, शेत तळे किंवा बोरमधून उपसावे लागते. तर पावसाळ्यात माती थेट धरणात वाहून जाते. ज्यामुळे मोठ्या प्रमाणात गाळ साचून राहतो. तो तसाच साठून राहील्याने धरणातील पाणी साठवन क्षमताही कमी होते. तर हा गाळ अनेक वर्षे साचून राहिल्याने कुजून सुपीक बनलेला असतो. जो आपल्या शेतात फायदा देणारा ठरतो. यासाठी राज्य सरकारने ‘गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार’ योजना आणली आहे. ज्यामुळे आता धरणातील गाळ थेट आपल्या शिवारात नेता येणार आहे.

सुपीक गाळ 

राज्यात गेल्या वर्षी सरसरीपेक्षा पाऊस कमी झाला आहे. त्यातच यंदा दुष्काळाचे सावट आहे. अनेक धरणातील पाणी साठा हा मृतसाठ्याच्या खाली गेला आहे. ही स्थिती गंभीर आहे. मात्र हीच संधी शेतकऱ्यांना चांगली आहे.

Fertile Silt From Dams
Galyukt Shiwar Scheme : ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’चा निधी रखडला

शेतकरी ‘गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार’ योजनेतून जलाशयात असलेला हा सुपीक गाळ आपल्या शेतात टाकू शकतात. धरणाच्या जलाशयातील हा गाळ आपल्या शेतात टाकण्यासह शेतकरी त्याची साठवण देखील करू शकतात. हा गाळ वापरून शेतकऱ्यांना शेतजमिनीची गुणवत्ता वाढवता येईल. यामुळे उत्पादन वाढण्यास मदत मिळेल. 

‘गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार’ योजना

एका माहितीनुसार आतापर्यंत राज्यातील ५९९ जलाशयात ६९ लाख ५४ हजार ४५८ लाख घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. तर ‘गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार’ योजनेतून जवळपास ६,७८० शेतकऱ्यांनी अनुदानाच्या मदतीने गाळ आपल्या शेतात टाकला आहे. 

Fertile Silt From Dams
Jalyukat Shivaar : माॅन्सूनच्या मुहूर्तावर मुख्यमंत्र्यांच्या गावात 'गाळ मुक्त धरण व गाळयुक्त शिवार'ला प्रारंभ

कायमस्वरुपी योजना 

दरम्यान पाऊस माती वाहून जाणे आणि ती गाळाच्या रूपात धरणात साठणे ही निरंतर चालणारी क्रिया आहे. यामुळे राज्य सरकारकडून गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार ही योजना कायमस्वरुपी राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर ही योजना सन २०२३-२४ याआर्थिक वर्षासाठी गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार २.० या शिर्षकाखाली आहे. तसेच या योजनेअंतर्गत काम अवनी ॲपमार्फत करण्यात येते. 

६९ लाख ५४ हजार ४५८ घन मीटर गाळ 

सध्या ३४ जिल्ह्याअंतर्गत या योजनेतंर्गत २७८ अशासकीय संस्था आणि १,७७३ जलाशय साठ्यांची नोंद झाली आहे. यापैकी प्रशासकीयदृष्ट्या निदर्शनास आलेले जलसाठे ८४१ असून १,०२० जलसाठ्यांना तांत्रिक मान्यता देण्यात आली आहे. तर ५९९ जलसाठयांमधून आतापर्यंत ६९ लाख ५४ हजार ४५८ घन मीटर गाळ काढण्यात आला आहे. तसेच गाळ काढण्याकरिता १,६२२ अर्ज प्राप्त झाले होते. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com