
Sangli Water Shortage Update : सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ, आटपाडी, जत या तालुक्यात टेंभू, म्हैसाळ योजनेचे पाणी पोहोचले असले तरी, या योजनेच्या माध्यमातून लाभ क्षेत्रातील तलाव पूर्ण क्षमतेने भरले नाही.
त्यातच वाढत्या उष्णनेते भूजल पातळी खालावली लागली असल्याने दुष्काळी पट्ट्यात पाणी टंचाई भासणार असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यातील ताकारी, टेंभू आणि म्हैसाळ उपसा सिंचन योजना सुरु दुष्काळी पट्ट्यातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी सुरु केल्या जातात. यंदाच्या हंगामात टेंभू, ताकारी उपसा सिंचन योजना वेळेत सुरु झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.
परंतु उपसा सिंचन योजना उशिरा सुरु झाली. परंतु पूर्ण क्षमतेने योजना सुरु नाही. उपसा सिंचन योजना सुरु करून दुष्काळी भागातील शेतीची तहान भागवली आहे.
यंदाच्या हंगामात टेंभू उपसा सिंचन योजना वेळेत सुरु झाल्याने आटपाडी, तालुक्यासह अन्य लाभ क्षेत्रातील गावात योजनेचे पाणी वेळेत मिळाले. त्यामुळे जानेवारी ते मार्च महिन्यापर्यंत पाणी टंचाई भासली नाही.
दरम्यान, म्हैसाळ उपसा सिंचन योजना सुरु करण्यासाठी शेतकऱ्यांनी मागणी सुरु केली. परंतु याकडे पाटबंधारे विभागाने दुर्लक्ष त्यामुळे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी योजना सुरु करण्याचे आदेश दिले. योजना सुरु झाली.
परंतु पूर्ण क्षमतेने योजना सुरु झाली नाही. परिणामी जत तालुक्यात पाणी पोहोचण्यासाठी विलंब होत झाला. मुळात दुष्काळी पट्ट्यात वाढत्या उष्णतेने मध्यम व लघु प्रकल्पातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे.
वास्तविक पाहता, या योजनेचे आवर्तन केवळ मुख्य कालव्यातूनच पुढे जात असल्याने कालव्या लगत असणाऱ्या शेतीला याचा फायदा होतो.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.