Ujani Dam Water Stock : उजनीतील पाणी आता फक्त पिण्यासाठीच

Water Crisis : उजनी धरण फेब्रुवारीतच झपाट्याने तळ गाठत असून, सध्या धरणातील पाणीसाठा मायनस १४ टक्क्यांपर्यंत आहे. शनिवारी धरणातून कालव्यातून सोडलेले पाणी बंद केले आहे.
Ujani Dam
Ujani DamAgrowon
Published on
Updated on

Solapur News : उजनी धरण फेब्रुवारीतच झपाट्याने तळ गाठत असून, सध्या धरणातील पाणीसाठा मायनस १४ टक्क्यांपर्यंत आहे. शनिवारी धरणातून कालव्यातून सोडलेले पाणी बंद केले आहे. असून उणे १५ टक्क्यांनंतर कॅनॉलमधून पाणी सोडणे आपोआप बंद होते. त्यामुळे तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर धरणातील पाणी केवळ पिण्यासाठीच राखीव ठेवले जाणार आहे.

उजनी धरणातून कालव्यात जानेवारीत सोडलेले पाणी आता १७ फेब्रुवारीला बंद केले जाणार आहे. आष्टी तलावात आवर्जून पाणी सोडण्यात आले असून सध्या हा तलाव ५२ टक्क्यांपर्यंत भरला आहे.

Ujani Dam
Ujani Dam Water : सांगोल्यासाठी 'उजनी'चे दोन टीएमसी पाणी मिळणार

या तलावावर ५१ गावांचा पाणीपुरवठा अवलंबून असून आता तलावात पाणी सोडल्याने उन्हाळ्यापर्यंत त्या गावांची चिंता मिटली आहे. धरण उणे १५ टक्के झाल्यावर कॅनॉल, बोगदा, उपसा सिंचन योजनांमधून पाणी सोडता येत नाही. त्यामुळे आता पावसाळ्यापर्यंत शेतीला पाणी सोडले जाणार नाही, हे निश्चित आहे.

उन्हाळ्यात धरणातून १३ टीएमसी पाणी बाष्पीभवनातून जाते. त्यामुळे एकूण ५६ टीएमसी मृतसाठ्यात १८ टीएमसीपर्यंत गाळ आणि बाष्पीभवनातून जाणारे पाणी, यातून केवळ २८ टीएमसीच पाणी शिल्लक राहणार आहे. त्यामुळे सोलापूर, धाराशिव, कर्जत-जामखेड, बारामतीसह सर्व पाणीपुरवठा योजनांची तहान संपूर्ण उन्हाळा कालावधीत भागवावी लागणार आहे.

Ujani Dam
Ujani Dam : उजनीतून सोडलेले उजव्या कालव्याचे पाणी बंद

४० टीएमसी पाणी संपले

१७ ऑक्टोबर २०२३ रोजी उजनीतील जिवंत पाणीसाठा ३२.३५ टीएमसी (मृत साठ्यासह एकूण ९६ टीएमसी) होता. पाऊस कमी झाल्याने धरण केवळ ६३ टक्केच भरले होते. पण, पावसाळा संपल्यावर वेळोवेळी पाणी सोडण्यात आले. उन्हाळ्याचे संकट तीव्र असतानाही अवघ्या चार महिन्यांत धरणातील ४० टीएमसी पाणी संपले.

सोलापूर शहरासाठी नदीतून दोन आवर्तने

सोलापूरला प्रत्येक ५५ ते ६० दिवसांनी उजनी धरणातून पाणी सोडावे लागते. भीमा नदीतून औज बंधाऱ्यापर्यंत तब्बल १६० किलोमीटर अंतर पार करण्यासाठी दहा दिवस लागतात. त्यामुळे दोन टीएमसी क्षमतेच्या औज बंधाऱ्यात पाणी पोहोचण्यासाठी प्रत्येक वेळी सहा ते सात टीएमसी पाणी सोडावे लागते. आता उन्हाळ्यात मार्च व मे महिन्यात उजनीतून सोलापूर शहरासाठी भीमा नदीतून दोनदा पाणी सोडले जाणार आहे.

धरणातील पाणी यापुढे पावसाळ्यापर्यंत पिण्यासाठीच वापरले जाणार आहे. उन्हाळ्यात जिल्ह्यात तीव्र पाणी टंचाई जाणवणार नाही, यादृष्टीने धरणातील पाण्याचे काटेकोर नियोजन करण्यात आले आहे.
- धीरज साळे, अधीक्षक अभियंता, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, सोलापूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com