Malshiras News : पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील पुरंदर उपसा पाणी योजना प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे महिन्यापासून बंद आहे. सध्या पाण्याची अत्यंत गरज असताना मागील लाभार्थी शेतकऱ्यांना पाण्याच्या टंचाईला सामोरे देण्याची वेळ आली आहे. योजनेची देखभाल दुरुस्तीची कामे पाहणारी एजन्सी वारंवार बदलली जात आहे. यामुळे ऐन पाण्याची गरज असताना शेतकऱ्यांना योजनेचे पाणी मिळत नसल्याची पाण्याअभावी पिके जळण्याच्या मार्गावर आहेत.
पुरंदर तालुक्यात भागामध्ये पावसाने पाठ फिरवल्याने खरीप हंगामातील शेवटच्या टप्प्यात असणारी पिके वाचविण्यासाठी व नव्याने रब्बी हंगामातील कांदा पिकांची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना पुरंदर तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात यंदा मुबलक पाऊस झाला असला तरी सासवडपासून पूर्वेकडील गावांमध्ये मात्र पावसाने पाठ फिरवली आहे. ही सर्व गावे पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या लाभ क्षेत्रामध्ये येतात.
यामुळे लाभ क्षेत्रातील या गावांचे योजनेचे पाणी मिळण्यासाठी मागील महिनाभरापासून मागणी आहे. यासाठी योजनेच्या अधिकारी वर्गांना फोन करून विनवणी करत असताना दुरुस्तीचे काम चालू असून दोनच दिवसांमध्ये पाणी सुरू होईल, असे महिन्याभरापासून अधिकारी शेतकऱ्यांना सांगत आहेत, मात्र महिना उलटून ही योजना सुरू होत, नसल्याने शेतकऱ्यांच्यात नाराजी आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.