Water Level : कोरड्या पडणाऱ्या प्रकल्पांच्या संख्येत दिवसेंदिवस भर

Marathwada Water Condition : पाण्यात पाण्याअभावी कोरड्या पडणाऱ्या मराठवाड्यातील प्रकल्पांची संख्या हळूहळू वाढते आहे. जवळपास ५५ लघू मध्यम प्रकल्प आजच्या घडीला कोरडे पडले आहेत.
Water Project
Water ProjectAgrowon

Chhatrapati Sambhajinagar : पाण्यात पाण्याअभावी कोरड्या पडणाऱ्या मराठवाड्यातील प्रकल्पांची संख्या हळूहळू वाढते आहे. जवळपास ५५ लघू मध्यम प्रकल्प आजच्या घडीला कोरडे पडले आहेत. त्यामध्ये ५३ लघू व दोन मध्यम प्रकल्पांचा समावेश आहे.

मराठवाड्यातील ८७७ लघू, मध्यम, मोठ्या प्रकल्पांसह नद्यांवरील बंधाऱ्यांमधील उपयुक्त पाणीसाठा ४० टक्क्यांवर आला आहे. यामध्ये मोठ्या ११ प्रकल्पांतील ४७ टक्के, ७५ मध्यम प्रकल्पांतील २४ टक्के, ७४९ लघू प्रकल्पांतील २५ टक्के, गोदावरी नदीवरील १५ बंधाऱ्यांमध्ये ५० टक्के, तर तेरणा, मांजरा, रेना नदीवरील २७ बंधाऱ्यांमधील ४१ टक्के उपयुक्त पाणीसाठ्याचा समावेश आहे.

Water Project
Vishnupuri Water Project : विष्णुपुरी प्रकल्प पुन्हा भरला शंभर टक्के

११ मोठ्या प्रकल्पांतील एकूण उपयुक्त पाणीसाठा गतवर्षीच्या तुलनेत आजच्या घडीला निम्माच आहे. मोठ्या प्रकल्पांपैकी माजलगाव प्रकल्पात केवळ नऊ टक्के तर निम्न तेरणा प्रकल्पात १३ टक्के, तसेच निम्न दुधना प्रकल्पात २० टक्केच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.

जायकवाडीतील उपयुक्त पाणीसाठाही ४३ टक्क्यांवर आला आहे. येलदरी प्रकल्पात ५८ टक्के, निम्न मनार प्रकल्पात ६० टक्के, विष्णुपुरी प्रकल्पात ८९ टक्के तर सिद्धेश्‍वर प्रकल्पात ९० टक्के उर्ध्व पैनगंगा प्रकल्पात ७४ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.

Water Project
Kukadi Water Project : आणे पठारचे पाण्यासाठीचे उपोषण, आंदोलन स्थगित

जालन्यातील ५७ लघू प्रकल्पात केवळ ४ टक्के उपयुक्त पाणी

७५० लघू प्रकल्पांपैकी जालन्यात ५७ लघू प्रकल्पांत केवळ चार टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. त्या पाठोपाठ परभणीमधील २२ प्रकल्पांत १२ टक्के, धाराशिवमधील २०६ प्रकल्पांत १५ टक्के, लातूरमधील १३४ प्रकल्पांत २१ टक्के, बीडमधील १२६ प्रकल्पांत २२ टक्के, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ९८ प्रकल्पांत २४ टक्के, नांदेड जिल्ह्यातील ८० प्रकल्पांत ७६ टक्के, हिंगोलीतील २७ लघू प्रकल्पांत ६८ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. गत तीन वर्षांतील सर्व लघू प्रकल्पांतील हा सर्वांत कमी पाणीसाठा ठरला आहे.

चार जिल्ह्यांतील मध्यम प्रकल्पांची अवस्थाही दयनीय

मराठवाड्यातील ७५ माध्यम प्रकल्पांपैकी जालना, धाराशिव, परभणी व लातूर या चार जिल्ह्यांतील मध्यम प्रकल्पांची अवस्था ही दयनीय आहे. धाराशिवमधील १७ मध्यम प्रकल्पांत केवळ १० टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. जालनामधील ७ मध्यम प्रकल्पांत १३ टक्के उपयुक्त पाणी शिल्लक आहे.

लातूरमधील ८ प्रकल्पांत १९ टक्के, परभणीतील दोन प्रकल्पांत १७ टक्के, बीडमधील सोळा प्रकल्पांत ३५ टक्के, छत्रपती संभाजीनगरमधील १६ प्रकल्पांत २२ टक्के, तर नांदेडमध्ये ९ मध्यम प्रकल्पांत ५१ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. लघू प्रकल्पातील गत तीन वर्षांतील या वेळची पाणीसाठाची स्थिती यंदा सर्वांत नीचांकी आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com