Ahilyanagar News: आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर महत्त्वाचा आहे. त्यासोबत कृषी प्रक्रिया उद्योगांची उभारणी होत असल्याने शेतीला चांगले दिवस येत आहेत..महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातूनच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढून ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक सक्षम होत आहे, असे मत पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले..Radhakrishna Vikhe Patil: शेतकऱ्यांनी कर्ज काढायच, कर्जबाजारी व्हायच आणि त्यानंतर कर्जमाफी मागायची; राधाकृष्ण विखे पाटलांचे शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त विधान.अहिल्यानगर येथे कृषी विभाग, आत्मा, जिल्हा परिषद, अहिल्यानगर यांच्या वतीने शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी आणि महिला बचतगटांनी केलेल्या साहित्याची विक्री करण्यासाठी पाच दिवसांचा कृषिपर्व महोत्सव होत आहे..Radhakrishna Vikhe Patil : दुध दराच्या प्रश्नावर मंत्री विखे पाटील यांचे स्पष्टीकरण.गुरुवारी (ता. ५) पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते त्याचे उदघाटन झाले. आमदार संग्राम जगताप, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, .अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, स्वामी विज्ञानानंद, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, आत्माचे प्रकल्प उपसंचालक राजाराम गायकवाड, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक संचालक मंजुषा ठवकर, उमेदचे व्यवस्थापक सोमनाथ जगताप आदी मान्यवर उपस्थित होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.