Supreme Court On MSP : महाराष्ट्रातील तीन शेतकऱ्यांची जनहित याचिका ; हमीभावबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले निर्देश
Farmer Rights : महाराष्ट्रातील प्रकाश गोपाळराव पोहरे, पुरुषोत्तम गवाडे आणि विशाल ओमप्रकाश रावत या तीन शेतकऱ्यांनी संविधानाच्या कलम ३२ अंतर्गत सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाचा संपूर्ण खर्चावर आधारित म्हणजेच सी२ या सूत्रानुसार हमीभाव मिळाला पाहिजे, जेणेकरून किफायतशीर नफा मिळेल.