
कासा : डहाणू तालुक्यातील अनेक शेतकरी सूर्या प्रकल्पामधील धामणी व कवडास या धरणातून उजव्या व डाव्या कालव्यातून सिंचनासाठी सोडलेल्या पाण्यापासून भातशेतीची लागवड करतात.
सध्या भाताची लोंबी जोमदार आली असून चांगले उत्पन्न मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. डहाणूसह वाडा तालुक्यात उन्हाळी भातशेती फुलोऱ्यात आल्यामुळे सर्वत्र हिरवे-पिवळे रंग दिसू लागले आहेत.
कासा, चारोटी, महालक्ष्मी, सारणी, तवा, सोनाळे, वाघाडी, वेती, रानशेत परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात उन्हाळी भातशेती बहरली आहे. दाणे भरून सुकल्यानंतर काही दिवसांत कापणीस सुरुवातदेखील केली जाणार आहे.
मागील वर्षात कोरोनाचे संकट आल्याने अनेक शेतकरी आपल्या पावसाळीसह उन्हाळी भातशेतीकडे वळले होते. सध्या बाहेर मजुरी करण्यापेक्षा आपली शेती करण्यासाठी प्राधान्य देत आहेत.
मागील काही वर्षांत अनेक शेतकरी शेतीकडे लक्ष देत नव्हते; पण उत्पादन चांगले मिळत असल्याने आणि रोजगार मिळत असल्याने आता अनेक शेतकरी शेतीमध्ये आवड जोपासत आहेत.
कालव्याला मेपर्यंत पाणी सोडणार
पावसाळ्यात लागवड केलेल्या शेतीपेक्षा उन्हाळी शेतीत चागले उत्पन्न मिळते. यावर कोणतेही अतिवृष्टी, रोगराई यांचे संकट येत नाही. त्यामुळे उदरनिर्वाहासाठी या शेतीचा उपयोग होत आहे. कृषी विभागाच्या मार्गदर्शनाने उत्तम प्रकारची बियाणेदेखील उपलब्ध होत आहेत.
सूर्या कालव्याच्या पाण्यातून डहाणू परिसरातील दुबार भातपिके तयार झाली आहेत. काही दिवसात कापणीला सुरुवात होणार आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.