Sugar Retail Prices: सणासुदीच्या काळात साखरेची दरवाढ रोखण्यासाठी केंद्र सरकारने अनेक उपाययोजना केल्या आहेत. तरीही देशांतर्गत बहुतांश किरकोळ बाजारांत साखरेचा दर प्रति किलो ६० रुपयांच्या वरच राहिला आहे, असे सरकारी आकडेवारीवरुन दिसून आले आहे. गेल्या काही दिवसांत साखरेचा किरकोळ दर प्रति किलो ७४ रुपयांपर्यंत पोहोचला होता. यामुळे सर्वसामान्यांच्या महागाईचा चटका बसला. .ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, रविवारी साखरेचा देशभरात सरासरी किरकोळ दर प्रति किलो ६४.२४ रुपये इतका होता. साखरेचा एका आठवड्यापूर्वी दर किलोमागे ६३.१२ रुपये होता. त्या तुलनेत सध्याचा दर १.७७ टक्क्यांनी अधिक आहे. सध्याचा दर हा एका महिन्याआधीच्या तुलनेत ३० टक्क्यांनी अधिक राहिला आहे. तर गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील दराच्या तुलनेत दरात ३८.६३ टक्क्यांनी वाढ झाली आहे..३० ऑगस्ट रोजी साखरेचा कमाल किरकोळ दर प्रति किलो ७४ रुपयांपर्यंत, तर किमान दर ४० रुपये इतका होता. शहरनिहाय दरावर नजर टाकल्यास दिल्लीत साखरेचा किरकोळ दर प्रति किलो ६२ रुपये, मुंबईत ६६ रुपये, चेन्नईत ६३ रुपये आणि रांची शहरात ६८ रुपयांवर होता..Sugar Prices: साखर दरवाढीमागची राजकीय अर्थव्यवस्था.देशांतर्गत बाजारात घाऊक भाव किलोमागे ५९.७३ रुपयांच्या पातळीवर स्थिर राहिले आहेत. हा दर गेल्या महिन्याच्या तुलनेत ३१ टक्क्यांनी आणि गेल्या वर्षीच्या तुलनेत ३८.६३ टक्क्यांनी अधिक आहे. साखरेचा आठवड्याभरापूर्वी घाऊक दर प्रति किलो ५८.६६ रुपयांवर होता. .केंद्र सरकारने १० लाख टन कच्च्या साखरेच्या शुल्कमुक्त आयातीस परवानगी देण्याचा निर्णय घेतला. यामुळे साखरेचा एक्स मिल दर जवळपास २० टक्क्यांनी खाली आला. पण किरकोळ आणि घाऊक बाजारातील दर वाढलेलेच राहिले आहेत. यामुळे सर्वसामान्यांना दरवाढीपासून दिलासा मिळालेला नाही. .Sugar Scam: साखरेचा ३६ हजार कोटींचा घोटाळा, काँग्रेसचा सरकारवर गंभीर आरोप.साखरेचा एक्स मिल दर आणि घाऊक दर याच्यात किलोमागे २ ते ३ रुपयांचा तसेच एक्स मिल दर आणि किरकोळ दरात किलोमागे ७ ते ८ रुपयांचा फरक असणे ही एक सामान्य बाब असल्याचे साखर उद्योगातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. साखर आयातीचा निर्णय घेण्यासोबतच साठा करण्यावर कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तसेच साखरेच्या अचानक दरवाढीवर अनेकांनी शंका उपस्थित केली. हा एक घोटाळा असल्याचा आरोप विरोधकांनी सरकारवर केला. .यंदा साखरेच्या उत्पादनात घट?देशात साखरेचा पुरेसा साठा आहे. तरीही ही दरवाढ कृत्रिम असल्याचे सांगत केंद्राने यासाठी साखर कारखान्यांना जबाबदार धरले. देशात २०२५-२६ या विपणन वर्षात (ऑक्टोबर ते सप्टेंबर) साखर उत्पादन ३४३ लाख टनांवर राहील, असा अंदाज याआधी वर्तवला होता. पण आता साखर उत्पादन ३०६ लाख टनांपर्यंत खाली येणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर देशांतर्गत साखरेची वार्षिक मागणी सुमारे २८०-२८५ लाख टन इतकी राहण्याची शक्यता आहे..सणासुदीत साखरेचे दर स्थिर ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य सरकार यंदाचा गाळप हंगाम १५ दिवस आधीच सुरू करण्याबाबत निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. जेणेकरुन साखर कारखाने दरवर्षीच्या १ नोव्हेंबर ऐवजी १५ ऑक्टोबरपासून गाळप हंगाम सुरु करतील. .१०० टक्के एफआरपी चुकती करणे बंधनकारक यंदा महाराष्ट्रात सुमारे १५.४ लाख हेक्टरवरील ऊस गाळपासाठी उपलब्ध होईल, असा प्राथमिक अंदाज बांधण्यात आला आहे. साखर आयुक्तालयाने गाळप परवान्यांसाठी ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत दिली आहे. परवाना घेण्यापूर्वी कारखान्यांनी मागील हंगामातील शेतकऱ्यांना १०० टक्के एफआरपी चुकती करणे बंधनकारक केले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.