Sugar Price Hike Update: साठेबाजीचा प्रकार कमी होऊन येत्या काही दिवसांत साखरेच्या किरकोळ दरात घट होईल, अशी शक्यता इंडियन शुगर अँड बायो-एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन अर्थात इस्मा (ISMA) ने व्यक्त केली आहे. मुख्यतः साठेबाजी आणि प्रतिकूल हवामानामुळे उत्पादनात झालेल्या घटीमुळे साखरेच्या दरात अचानक वाढ झाली असल्याचे त्यांचे म्हणणे आहे..साखरेच्या दरातील वाढ ही बाजारातील मूलभूत परिस्थितीमुळे झालेली नाही. तर साठेबाजी यामागील कारण आहे. देशात साखरेची कसलाही टंचाई नाही, असेही 'इस्मा'चे अध्यक्ष नीरज शिरगावकर यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी पुढे म्हटले आहे की, या निर्माण केलेल्या कृत्रिम टंचाईला तसेच साखरेच्या वाढत्या दराला साखर कारखाने जबाबदार नाहीत. केंद्र सरकारच्या १० लाख टन कच्च्या साखरेच्या शुल्कमुक्त आयातीच्या निर्णयानंतर अचानक वाढलेले दर आता कमी होऊ लागले आहेत, असा दावा त्यांनी केला आहे..Sugar Price Hike: साखरेचे भाव अचानक का वाढले? सखोल चौकशीची मागणी.देशात सप्टेंबरच्या अखेरीस साखरेचा सुमारे ३५ लाख टन साठा राहण्याचा अंदाज आहे. कारखान्यांकडून १५ ऑक्टोबरच्या दरम्यान गाळप हंगाम सुरू केला जाण्याची शक्यता आहे. ते ऑक्टोबरच्या पहिल्या महिन्यात १० ते १२ लाख टन साखरेचे उत्पादन घेतील. त्या तुलनेत या महिन्यात साखरेची सुमारे २४ ते २५ लाख टन इतकी मागणी राहील, असे त्यांचे म्हणणे आहे..Sugar Price Hike: साखरेचे दर वाढले, आता ऊस उत्पादकांना ५०० रुपयांचा दुसरा हप्ता द्या, राजू शेट्टींची मागणी.यंदा ऊस गाळप हंगाम नोव्हेंबरच्या सुरुवातीऐवजी १० ते १५ दिवस आधीच म्हणजे १५ ऑक्टोबरच्या दरम्यान सुरू होण्याची शक्यता आहे. तसेच सध्या तामिळनाडू आणि कर्नाटकात विशेष गाळप प्रक्रिया सुरू आहे. या पार्श्वभूमीवर, 'इस्मा'ने ऑक्टोबरमधील साखरेचे उत्पादन नेहमीच्या ४ लाख टनांवरून १० लाख टनांपर्यंत वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. .'इस्मा'च्या मते, मोठ्या प्रमाणात साखरेची खरेदी करणारे खरेदीदार एक ते दोन महिने आधीच साठा करु लागतात. परिणामी दरावर दबाव निर्माण होतो. सध्या साखरेचा साठा पुरेसा आहे. सध्या किरकोळ दरातील मोठी वाढ ही साखर टंचाईमुळे अथवा उपलब्धतेअभावी झालेली नाही..'इथेनॉल'साठी अधिक प्रमाणात साखर वळविली का? सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या दरात मोठी वाढ झाली आहे. यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अपेक्षेपेक्षा कमी उत्पादनाचा अंदाज, प्रतिकूल हवामानामुळे ऊस पिकांचे झालेले नुकसान, जागतिक पुरवठ्यासंदर्भातची चिंता आणि साठेबाजीमुळे दरात वाढ झाली असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. इथेनॉल उत्पादनासाठी अधिक प्रमाणात साखर वळविली असल्याने दर वाढल्याचा दावाही सरकारने फेटाळून लावला आहे. .देशांतर्गत उपलब्धता वाढवणे आणि दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने १३ मे ते ३० सप्टेंबर या कालावधीत साखर निर्यातीवर बंदी घातली होती. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.