
Sindhudurg News : जिल्ह्यातील वैभववाडी आणि फोंडा परिसरातील अनेक गावांमध्ये गुरुवारी (ता. ८) पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. या पावसामुळे सर्वांचीच ताराबंळ उडाली. अनेक भागांत अर्धा तास सरी कोसळल्या. या पावसामुळे पूर्वपट्ट्यातील आंबा हंगामासमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पावसामुळे लग्न आणि इतर धार्मिक कार्यक्रमांमध्ये व्यत्यय आला. दरम्यान शुक्रवारी (ता. ९) सकाळपासून सर्वत्र दिवसभर ढगाळ वातावरण होते. हवामान विभागाने रविवारपर्यंत (ता. ११) पावसाचा अंदाज दिला. विजांचा कडकडाट नाही किंवा वादळीवारे नाही किंवा पाऊस पडेल असे ढगाळ वातावरण देखील नाही.
मात्र असे असताना गुरुवारी वैभववाडी तालुक्यातील खांबाळे, आर्चिणे, लोरे, वैभववाडी, एडगाव, कोकिसरे या भागांत जोरदार पावसाला सुरुवात झाली. पावसाळ्याप्रमाणे पावसाच्या जोरदार सरी पडत होत्या. अर्ध्या तासापेक्षा अधिक काळ या भागात पाऊस झाला. या शिवाय फोंडा परिसरातील काही गावांमध्ये पावसाच्या सरी कोसळल्या.
कोणत्याही चाहुलीशिवाय आलेल्या या पावसाने सर्वांचीच ताराबंळ उडाली. सकाळीच कामावर निघालेल्या शेकडो दुचाकीस्वारांना रस्त्यालगत असलेल्या निवारा शेडमध्ये आश्रय घ्यावा लागला. अनेक भागांत पावसाचे पाणी साचले होते. काही ठिकाणी रस्त्यावरून पाणी वाहत होते. या पावसानंतर सर्व जिल्ह्यात दिवसभर पावसाचे वातावरण होते.
सायकांळी पुन्हा कोणत्याही क्षणी पाऊस पडेल अशी स्थिती झाली होती. जिल्ह्याच्या उर्वरित तालुक्यांत पाऊस झाला नसला तरी ढगाळ वातावरण होते. शुक्रवारच्या पावसाचा पूर्वपट्ट्यातील आंबा पिकावर परिणाम होणार आहे. या पट्ट्यातील आंबा हंगाम सुरू होऊन पाच ते सहा दिवसच झाले आहेत. त्यामुळे आंबा पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. शुक्रवारी सकाळपासून जिल्ह्यात पावसाचे वातावरण आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.