Nashik News: ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास आणि शेतीमालाच्या सुलभ वाहतुकीसाठी शेत व पाणंद रस्ते अधिक मजबूत होणे गरजेचे आहे. त्यासाठी ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत व पाणंद रस्ते योजना’ संबंधित यंत्रणांनी समन्वयाने आणि प्रभावीपणे राबवावी, अशा सूचना शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी येथे दिल्या..नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे शासकीय विश्रामगृहात या योजनेच्या अंमलबजावणीबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी अप्पर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, प्रांताधिकारी नितीन सदगीर, उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत बाविस्कर, तहसीलदार विशाल सोनवणे.Farm Roads: शेतकऱ्यांना शेतापर्यंत जाण्यासाठी टिकाऊ पाणंद रस्ते व्हावेत.तंत्र अधिकारी एस. एन. गाडे, डी. एस. शिंदे, अल्पेश पाटील, मच्छिंद्र साबळे, तालुका कृषी अधिकारी भगवान गोर्डे, गायत्री सोनवणे, अप्पर तहसीलदार ज्योती देवरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते..रस्त्याची कामे केली जाणार आहे. आराखडा तयार झाल्यानंतर तालुकास्तरीय समितीला अहवाल सादर करा. नकाशावर किती रस्ते आहेत याची तपासणी करावी. योजनेअंतर्गत करण्यात येणाऱ्या रस्त्यांच्या आराखड्याची गरजेनुसार आखणी करण्याबाबत स्पष्ट निर्देश दिले. तसेच शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळेल, या दृष्टीने योजनेची अंमलबजावणी प्रभावी, पारदर्शक आणि वेळेत पूर्ण होणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी येथे सांगितले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.