Ahilyanagar News : सरकारने आकडेवारी जाहीर केली म्हणजे आश्रु पुसता येत नाहीत. आपत्तीने शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त झाले असताना पाषाणहृदयी सरकारला पाझर फुटेना. शेतकऱ्यांनीही कितीही टोहो फोडला तरी सरकारला आश्रु कळत नसतील तर दुर्दैवी आहे, अशी टीका काँग्रेस नेते व माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली..अहिल्यानगर जिल्ह्यात पूर, अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागांत जाऊन श्री. थोरात यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर अहिल्यानगर येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी सरकारच्या भूमिकेवर टीका केली. ते म्हणाले, की अहिल्यानगर जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागांत अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे. .Rain Crop Damage : अतिवृष्टीमुळे ऑगस्टमध्ये ९२ कोटी रुपयांचे नुकसान.मी छत्रपती संभाजीनगरसह अनेक भागांत परिस्थितीची पाहणी केली. पाथर्डी, शेवगाव तालुक्यांतील अनेक गावांना भेटी देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. या शेतकरी कुटुंबांना तातडीने मदतीची गरज आहे. या पाषाणहृदयी सरकारला मात्र काही केल्या पान्हा फुटत नाही. .शेतकरी आश्रु ढाळत असताना सरकारला त्यांची वेदना दिसत नाही. केवळ आकडेवारीचा खेळ करून शेतकऱ्यांच्या डोळ्यातले अश्रू पुसता येणार नाहीत. दुर्दैवाने शेतकरी मोठ्या संकटात आहेत, खूप नुकसान झाले आहे. .Rain Crop Damage : अतिवृष्टी पीकनुकसानीचे ८६ टक्के पंचनामे पूर्ण.जमिनी वाहून गेल्या आहेत, काही शेतकरी आत्महत्या करत आहेत. शेतकरी ज्यांना लक्ष्मी मानतो त्या पशुधनाचे मोठे नुकसान झाले आहे. अशा संकटात सरकार कोठे आहे, असा प्रश्न पडतो आहे. मंत्री येतात आणि जातात. काही बोलत नाहीत. उत्तरे देत नाहीत. त्यांच्यामध्ये आत्मविश्वास नाही.ते म्हणाले, की मी आई मोहटादेवी मातेच्या चरणी अशा नैसर्गिक संकटामध्ये शेतकरी बांधवांना ताकद दे आणि या राज्य व केंद्र सरकारला शेतकऱ्यांना मदत करण्याची सद्बुद्धी दे अशी प्रार्थना केली आहे. आमदार हेमंत ओगले यांच्यासह पदाधिकारी या वेळी उपस्थित होते..दिवाळीपूर्वी कर्जमाफी, मदत द्याबाासाहेब थोरात म्हणाले, की सरकारने राजधर्म पाळणे आवश्यक आहे. सरकारने शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी भरीव मदत आणि कर्जमाफी द्यावी, अशी आमची मागणी आहे. सकारने त्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर आम्ही आमची पुढील भूमिका जाहीर कर.राज्यभरातील शेतकरी संकटात आहे. परंतु सरकारला त्याचे कोणतेच गांभीर्य नाही. सरकारला या परिस्थितीचे गांभीर्य असते, तर त्यांचे जिल्हाधिकारी (धाराशिव) शेतकऱ्यांना संकटात सोडून एखाद्या कार्यक्रमात नाचले नसते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.