Goshala : प्रत्येक गावात गोशाळा सुरू करा

Rashtrasant Kamalmuni Kamlesh : गोमातेच्या रक्षणासाठी प्रत्येक गावात गोशाळा सुरु झाल्या पाहिजेत यासाठी सरकारने पावले उचलावीत असे आवाहन राष्ट्रसंत कमलमुनी कमलेश यांनी येथे पत्रकार परिषदेत केले.
Rashtrasant Kamalmuni Kamlesh
Rashtrasant Kamalmuni KamleshAgrowon

Malegaon News : देशात अनेक राज्यांमध्ये मत्स्य मंत्रालय आहे. मात्र गो मंत्रालय नाही. देशात दोन प्रकारचे कायदे चालतात. पॉलिथिन पिशवीवर बंदी आहे. मात्र पॉलिथिन उत्पादनासाठी परवानगी दिली जाते. पृथ्वीवरचा प्रत्येक प्राणी उपयोगी आहे. प्रकृतीचे संवर्धन झाले तरच माणूस जगेल. माणूस जगला तर धर्म व संस्कृती जगेल.

गाय पर्यावरणाचा आधार आहे. संस्कृतीचा प्राण आहे. गोमाता असेल तरच विश्‍व असेल. गोमातेच्या रक्षणासाठी प्रत्येक गावात गोशाळा सुरु झाल्या पाहिजेत यासाठी सरकारने पावले उचलावीत असे आवाहन राष्ट्रसंत कमलमुनी कमलेश यांनी येथे पत्रकार परिषदेत केले.

Rashtrasant Kamalmuni Kamlesh
Goshala Subsidy : गोशाळांना मिळणार १५ ते २५ लाख अनुदान

राष्ट्रसंत कमलमुनी कमलेश कश्मीर ते कन्याकुमारी सह संपूर्ण देशात ७० हजार किलोमीटरची पायी यात्रा करीत आहेत. गोरक्षा, व्यसनमुक्ती, पर्यावरण, सर्व धर्म समभाव, राष्ट्रीय एकात्मता या संदर्भात ते १९८० पासून काम करीत आहेत. ४४ वर्षात त्यांनी नेपाळसह भारतातील १८ राज्यांमधून प्रवास केला. यावेळी मालेगाव येथे कमलमुनी कमलेश आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, की देशात कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी होत नाही.

दारुबंदी, व्यसनमुक्तीसाठी जनजागृती केली जाते. मात्र दारू उत्पादन व विक्रीचे परवाने दिले जातात. माणसाशिवाय प्रकृती राहू शकते. मात्र प्रकृतीशिवाय माणूस जिवंत राहू शकत नाही. देशात पर्यावरणाचे संवर्धन झाले पाहिजे. धर्माच्या नावावर प्रकृतीला हानी पोचत आहे. प्रकृती परमात्म्याचे रुप आहे. प्रकृतीशी छेडछाड करणे म्हणजे परमात्म्याशी छेडछाड करणे होय. पृथ्वीचे तापमान वाढत आहे.

Rashtrasant Kamalmuni Kamlesh
Goshala Subsidy : राजस्थानात गोशाळांना चार वर्षांत मिळाले २ हजार कोटींचे अनुदान ; मुख्यमंत्री गेहलोत यांचा दावा

यावेळी येथील जैन श्रावक संघाचे संघपती राजेंद्र ओस्तवाल, पारस बाफना, विनोद गुगळे, अशोक ओस्तवाल, शांतिलाल बाफना आदी पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान पालकमंत्री दादा भुसे यांनी राष्ट्रसंत कमलमुनी कमलेश यांचे दर्शन घेतले. आगामी आर्थिक संकल्पात गोशाळांना अनुदान देण्यासंदर्भात निधीची तरतूद करण्याचे आश्‍वासन त्यांनी दिल्याचे यावेळी सांगण्यात आले.

प्रत्येक मंदिराला गोशाळा जोडावी

महाराष्ट्र शासनाने आजपर्यंत गोमातेसाठी कोणताही निधी दिला नाही. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान आदी राज्यांच्या धर्तीवर गोशाळांना अनुदान द्यावे. गावपातळीवरचे कोंडवाडे पुनरुज्ज्वीवित झाले पाहिजे. जनावरे रस्त्यावर फिरतात. त्यामुळे जनावरे व शेती दोघांचे नुकसान होत आहे.

कत्तलखान्यांना जमीन मिळते, मात्र गोशाळांना जमीन मिळत नाही. त्यामुळे भारतातील प्रत्येक मंदिराला एक गोशाळा जोडली पाहिजे. पशुधन राहिले तरच प्रकृती राहील. एक गोवंश वाचविणे म्हणजे पाच मंदिरे बांधण्यासारखे आहे. नेपाळ सरकारने गायीला राजमातेचा दर्जा दिला आहे. मग भारत सरकार का देवू शकत नाही. गाय वाचेल तर विश्‍व वाचेल. हत्यारांनी नाही तर सात्त्विक विचारानेच विश्‍वात शांती निर्माण होईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com