Beed News: सातत्याने झालेल्या अतिवृष्टीत पिके वाहून गेल्यानंतर कसेबसे हातात पडलेले सोयाबीन शेतकऱ्यांना कवडीमोल भावात विकावे लागण्याची वेळ आली आहे. गेल्या दीड महिन्यात तब्बल एक लाख २९ हजार ४३० क्विंटल सोयाबीन बाजारात विकले गेले असून त्याचे एकूण बाजारमूल्य ५५ कोटी ६५ लाख ४९ हजार रुपये आहे. मात्र, माजलगावात शासकीय खरेदी केंद्र अद्यापही सुरू नसल्याने शेतकऱ्यांना क्विंटलमागे जवळपास एक हजार रुपयांचा तोटा सहन करावा लागत असून एकूण सुमारे १३ कोटी रुपयांचा फटका बसल्याचे स्पष्ट झाले आहे..यंदाचा मॉन्सून म्हणजे शेतकऱ्यांसाठी ओला दुष्काळच ठरला. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू झालेला पाऊस सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत न थांबता कोसळत राहिला. त्यामुळे खरिपातील सोयाबीन, कापूस, मूग, उडीद यांसारख्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले. महिनोमहिने शेतात पाणी साचल्याने पिके पिवळी पडली, तर सोयाबीनच्या शेंगांना कोंब फुटल्याने उत्पादनाची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात ढासळली.Heavy Rain in Parbhani: सोयाबीन, कापूस, ऊस पिकाला बसला मुसळधारेचा फटका.शासनाचा सोयाबीनसाठी निश्चित केलेला हमीभाव ५,३२८ रुपये क्विंटल असताना व्यापाऱ्यांनी सुरवातीच्या काळात सोयाबीन ३,००० ते ३,५०० रुपये क्विंटल या कवडीमोल दरात खरेदी केल्याने शेतकऱ्यांची अक्षरशः लूटच झाली. खरेदी केंद्र सुरू नसल्यामुळे शेतकरी थेट बाजारातच माल विकण्यास मजबूर झाले आणि व्यापाऱ्यांचा मोठा फायदा झाला..Climate Change : शेतकऱ्यांना बदलत्या हवामानामुळे दरवर्षी ७० हजार कोटींचा फटका: डाॅ. वार्ष्णेय.शासनाचे ‘वराती मागून घोडे’ धोरण कायमदरवर्षी प्रमाणेच यंदाही शासनाने पिकांना हमीभाव तर जाहीर केला; पण शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्यात मात्र उशीर केला. शेतकऱ्यांचा मोठा माल आधीच बाजारात निसटून गेल्यानंतरच खरेदी केंद्रांना अनुमती मिळते, ही परंपरा बदललेली नाही. व्यापाऱ्यांची चांदी झाल्यानंतर येणारी शासकीय खरेदी केंद्रे म्हणजे शेतकऱ्यांच्या मते ‘वराती मागून घोडे’चे उत्तम उदाहरण..सहा एकरांत सोयाबीनची पेरणी केली होती; पण सततच्या पावसामुळे पीक पिवळे पडले. फक्त २४ क्विंटल उत्पादन झाले आणि तेही तीन हजारांच्या दराने विकावे लागले. शासकीय खरेदी सुरू नसल्याने मला तब्बल ५५ हजार रुपयांचे नुकसान सहन करावे लागले.- दगडूबा उगले, शेतकरी, चिंचगव्हाण.सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी पाठपुरावा करत आहोत. आतापर्यंत मोंढ्यात सव्वा लाख क्विंटलपेक्षा अधिक सोयाबीनची खरेदी झाली आहे.- जयदत्त नरवडे, सभापती, बाजार समिती, माजलगाव.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.