Jalna Silk Cocoon Market Inaguration: जालना ही केवळ सिल्क सिटी नाही तर आता ही ट्रिपल एस सिटी झाली आहे. सिल्क, सीड आणि स्टील अशी ट्रिपल एस सिटी म्हणून जालन्याची ओळख आहे. विशेषतः सिल्कच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात एक अर्थव्यवस्था या ठिकाणी उदयास येत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटले. कापूस आणि सोयाबीन पिकाला तुती रेशीम हा अतिशय उत्तम पर्याय असून, यात शेतकऱ्यांना जास्त कमाईची संधी असल्याचे त्यांनी नमूद केले..जालना येथील रेशीम कोष बाजारपेठ इमारतीचे लोकार्पण आज मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. गेली अनेक वर्षे नकदी पीक म्हणून आपण कापूस आणि सोयाबीन या दोन पिकांवर अडकलो आहोत. खरंतर देशामध्ये उत्पादकतेतही कापूस आणि सोयाबीनमध्ये जेवढी उत्पादकता मिळवली पाहिजे. तेवढी अद्याप आपण मिळवू शकललो नाही. तो प्रयत्न आपला चालला आहे. पण जोपर्यंत शेतकऱ्यांना पर्यायी नकदी पीक आपण देत नाही, तोपर्यंत कापूस आणि सोयाबीनच्या भोवतीची अर्थव्यवस्था फार काही बदलू शकत नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले..तुती रेशीम हा त्यावर अतिशय उत्तम पर्याय आहे. ज्या माध्यमातून अगदी अल्पभूधारक शेतकरीदेखील जसा उसाचा शेतकरी चांगला पैसा कमवतो; त्याहीपेक्षा जास्त पैसा कमवण्याची संधी शेतकऱ्याला आहे. पण याची मूल्य साखळी विकसित होत नाही. बाजारपेठ आणि बाजारपेठेनंतर कपड्यापर्यंतची मूल्य साखळी तयार होणे हे सगळ्यात महत्त्वाचे आहे. आज या ठिकाणी बाजारपेठ झाली. पहिला लिलाव फार छान झाला. ही संपूर्ण मूल्य साखळी तयार करत आहोत, असे ते म्हणाले. .Silk Farming : धाराशिवच्या कोषाला राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा मिळाला दर.जालन्याचा नवा ब्रँड या निमित्ताने तयार करता येईल. ८० टक्के सिल्क आपण चीनमधून आयात करतो. एककाळ असा होता की जगाला आपण सिल्क निर्यात करणारे आपण होतो. पुन्हा त्या दिशेने जायचे आहे. त्यासाठी शेतकऱ्यांचे प्रशिक्षण आणि मूल्यसाखळी तयार करण्यासाठी चांगल्या पद्धतीचा कौशल्य विकास या दोन्ही गोष्टींवर आपण भर देऊ, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली..Silk Farming Success Story: रेशीम शेतीमुळे खामकरवाडी झाले समृद्ध गाव.जालन्यात राज्यातील पहिली रेशीम कोष खरेदी बाजारपेठ जालन्यात राज्यातील पहिली रेशीम कोष खरेदी बाजारपेठ उपलब्ध झाल्यामुळे जालनासह राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी महायुती शासन कटिबद्ध असल्याचे पर्यावरण व वातावरणीय बदल आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले. यावेळी मंत्री संजय सावकारे, जालन्याचे खासदार कल्याणराव काळे, आमदार बबनराव लोणीकर, अर्जुन खोतकर, संतोष दानवे, नारायण कुचे, हिकमत उढाण, राजेश टोपे, महापौर सौ. वंदना मगरे आदी उपस्थित होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.