Political Statement: देशात सध्या अस्वस्थता आहे. आर्थिक आणीबाणीची ‘एक्सट्रीम पोझिशन’ येणार नाही, मात्र हे गांभिर्याने घेतले पाहिजे. एक - दोन दिवसांच्या काटकसरीने काही फरक पडणार नाही. या बाबत पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाची नोंद घेतली पाहिजे. यासाठी देशातील सर्व पक्षांच्या नेत्यांची बैठक घेऊन, पंतप्रधानांनी स्वत: गांभिर्याची जाणीव करून द्यावी,’’ अशी भूमिका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी येथे गुरुवारी (ता. १४) पत्रकार परिषदेमध्ये मांडली..या वेळी पवार म्हणाले, ‘‘पंतप्रधानांच्या काटकसरीच्या आवाहनानुसार विविध नेत्यांचे कामकाज मी सकाळपासून टीव्हीवर पाहतोय. कोणी मोटरसायकलवर जात आहे. हे एक-दोन दिवस ठीक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांच्या ताफ्यातील गाड्या कमी केल्याचे सांगितले. पूर्वी १७ गाड्या ताफ्यात होत्या. त्यावरून आता आम्ही ८ गाड्यांवर आलो आहोत. . GDP growth India 2026 : २०२६ मध्ये भारताची अर्थव्यवस्था ६.४ टक्क्यांनी वाढेल; संयुक्त राष्ट्र संघाचा अंदाज.मला तर धक्काच बसला. १७ गाड्या ताफ्यात यापूर्वी नेमक्या कशासाठी होत्या, हे काही मी समजू शकलो नाही. कमी केल्यानंतर त्या गाड्या आठवर आल्या. याचा अर्थ या सगळ्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन अधिक गांभिर्याचा असला पाहिजे. पूर्वी अशी स्थिती या देशात झाली नव्हती असं नव्हतं. एकंदर देशाच्या अर्थव्यवस्थेची आणखी काळजी करावी, अशी परिस्थिती पुन्हा येऊ नये यासाठी सर्वांनी या प्रश्नावर सहकार्य करण्याची गरज आहे.’’.India Australia Trade Deal: भारताच्या शेती क्षेत्रावर नजर, ऑस्ट्रेलियाच्या उच्चायुक्तांनी व्यक्त केली कराराची शक्यता.विलीनीकरणाची चर्चा झाली होतीदोन्ही राष्ट्रवादी विलीनीकरणाची चर्चा अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात झाली होती. त्याबाबत अजित यांनी मला एकत्र येण्याबाबत सांगितले होते, पण आता त्यावर कोणतीही चर्चा नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. पटेल, तटकरे यांच्याबाबत बोलताना ते म्हणाले, की प्रफुल्ल पटेल हे २००३ पासून माझ्या सोबत संसदेत उत्तम काम करत होते. तर सुनील तटकरे अर्थमंत्री, पक्षाचे राज्याचे प्रमुख होते. त्यांनी देखील उत्तम काम केले आहे. मात्र आता त्यांचा कोण कसा वापर करून घेत आहे, हे पाहिले पाहिजे..शेतीमालाचे घसरते दर चिंता वाढविणारेशेतीमालाचे दर घसरत आहेत. कांदा हे सर्वसामान्य शेतकऱ्याचे महत्त्वाचे पीक आहे. मात्र, या पिकाला रास्त दर मिळत नाही. उसाला अपूरी किंमत मिळत आहे. साखर कारखाने १०० दिवसांपेक्षा अधिक चालले पाहिजे, ते चालत नाहीत. ऊस उत्पादकाला वेळेवर पैसे मिळत नाही. अशा परिस्थितीत साखर निर्यातबंदीमुळे आणखी प्रश्न निर्माण होईल, हे घातक आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे खतांच्या पुरवठ्यावर परिणाम होणार आहे, असे ही पवार म्हणाले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.