Sharad Pawar : कांदा उत्पादक शेतकऱ्यांवरून शरद पवार, राहुल गांधी यांचा भाजप सरकारवर हल्लाबोल

Bharat Jodo Nyaya Yatra : काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा अंतिम टप्प्यात आली असून गुरूवारी (ता.१४) नाशिकच्या चांदवडमध्ये आली. यावेळी कांदा निर्यात बंदीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांवरून शरद पवार यांच्यासह राहुल गांधी यांनी भाजपवर टीका केली आहे.
Sharad Pawar
Sharad PawarAgrowon

Pune News : काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा अंतिम टप्प्यात आली असून गुरूवारी (ता.१४) नाशिकच्या चांदवडमध्ये आली. यावेळी झालेल्या सभेतून ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षा’चे अध्यक्ष खासदार शरद पवार आणि राहुल गांधी यांनी केंद्रातील भाजप सरकारवर टीका केली आहे. शरद पवार यांनी, केंद्रातील मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी कर्ज घेऊन आत्महत्या करत आहेत. तर कांदा निर्यात बंदीमुळे शेतकरी संकटात सापडा आहे, अशी टीका केली आहे. तर राहुल गांधी यांनी, १० वर्षात मोदींनी १६ लाख कोटी २०-२२ उद्योगपतींचे कर्ज माफ केले मात्र शेतकऱ्यांचे कोणतेच कर्ज माफ केले नाही असा हल्लाबोल केला आहे.

केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदीमुळे राज्यातील कांदा उत्पादकासह सामान्य शेतकरी हा अडचणीत सापडला आहे. मात्र यावर केंद्रातील मोदी सरकारकडून कोणतीच उपाययोजना केली जात नाही. यामुळेच शेतकरी कर्ज घेऊन आत्महत्या करत असल्याची टीका शरद पवार यांनी केली आहे. यावेळी शरद पवार म्हणाले, देशातील शेतकरी हा अडचणीत सापडला आहे. राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात आहे. मात्र या मोदी सरकारला याचे काही पडलेले नाही. कर्जमाफीबाबत काही बोलत नाही. पण आम्ही ७० हजार कोंटीचे कर्ज माफ केले.

Sharad Pawar
Sharad Pawar : ईडीकडून जाणून बुजून कारवाई; शरद पवार यांची रोहित पवार यांच्यावरील कारवाईवरून टीका

राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर झाले असून शेतकरी कर्जबाजारी होत आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय झाल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे.

Sharad Pawar
Sharad Pawar : शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ, हीच मोदींची गॅरंटी ; शरद पवारांचा पंतप्रधनांवर हल्लाबोल

दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील शेतकरी, अग्नीवीर, महागाई, बेरोजगारी या वियषांवरून मोदी सरकारवर टीका केली आहे. यावेळी राहुल गांधी म्हणाले, "देशातील सर्वात मोठा मुद्दा महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. पण त्यावर कधीही चर्चा होत नाही.

पंतप्रधान मोदींच्या सरकारने गेल्या १० वर्षांत किती कर्जमाफी केली?" किती कर्ज माफ केले. नाही आम्ही केले. आमचे सरकार असताना ७० हजार कोंटीचे कर्ज आम्ही माफ केले. आज दिल्लीच्या रामलीला मैदानावर शेतकरी उभा आहे. मोदींनी शेतकऱ्यांच्या कर्जाचा एक रुपयाही माफ केला नाही. पण अब्जाधीशांचे १६ लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले. जे मनरेगाच्या २४ वर्षांचा खर्च आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com