Water Crisis : अहिल्यानगर जिल्ह्यात जाणवू लागली पाणीटंचाई

Water Scarcity : जिल्ह्यात यंदा दरवर्षीच्या तुलनेत पंधरा दिवस आधीच पाणीटंचाई जाणवू लागली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात टॅंकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी वाढू लागली आहे.
Water Tanker
Water Tanker Agrowon
Published on
Updated on

Ahilyanagar News : जिल्ह्यात यंदा दरवर्षीच्या तुलनेत पंधरा दिवस आधीच पाणीटंचाई जाणवू लागली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात टॅंकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी वाढू लागली आहे. सध्या संगमनेर तालुक्यात ५ गावे आणि ८ वाड्यांना ६ टॅंकरने पाणी पुरवठा केला जात आहे. या महिना अखेरीस टॅंकरची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यात यंदा पावसाळ्यात चांगला पाऊस झाला होता. शिवाय मागील पाच वर्षात जलयुक्त शिवार अभियानाची कामे झाल्याने यावर्षी शेतीची रब्बी आणि उन्हाळ्याची स्थिती चांगली राहील, शिवाय पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवणार नाही असे वाटत होते.

मात्र परिस्थिती उलट झाली आहे. यंदा जानेवारी-फेब्रुवारीतच पाणी पातळी अचानक खालावली. विंधन विहीरी, विहीरी, गाव तलाव, पाझर तलाव कोरडे पडले, त्याचा परिणाम शेतपिकांवर दिसून आला. वेळेवर पाणी मिळाले नसल्याने यंदा पिकांना फटका बसला, आता पिण्याची पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे.

Water Tanker
Water Scarcity : यवतमाळ जिल्ह्यातील तीन गावांत टँकरने पाणीपुरवठा

यंदा दरवर्षीच्या तुलनेत पंधरा दिवस आधीच पाणी टंचाई जाणवू लागली आहे. संगमनेर तालुक्यात ५ गावे आणि ८ वाड्यांना ६ टॅंकरने पाणी पुरवठा केला जात आहे. पारनेर, अहिल्यानगर, पाथर्डी, कर्जत, जामखेड भागात टॅंकरची मागणी होत असून या महिना अखेरीस टॅंकरची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

Water Tanker
Water Scarcity in Dharashiv :धाराशिव जिल्ह्यात पाणी टंचाईच्या झळा; ५० टक्क्यांच्या आत पाणीसाठा

कोट्यवधींच्या योजना फेल

अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रत्येक गावांतील प्रत्येक कुटुंबाला पिण्याची पाणी मिळावे यासाठी जलजीवन योजना करण्यात आल्या आहेत. त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. मात्र बहुतांश योजनांची कामे पूर्ण झाली नाहीत. जेथे योजना पूर्ण झाली.

तेथेही लोकांनी पाणी मिळत नाही. जलजीवन योजनांच्या मोठ्या तक्रारी आहेत. योजनांची कामे निकृष्ट झाली असून कोट्यवधी रुपयांचा यात गैरव्यवहार झाल्याचा सातत्याने आरोप होत आहे. खासदार नीलेश लंके यांनी चौकशीची मागणी करूनही जिल्हा परिषदेत प्रभारी राज असल्याने तक्रारीबाबत फारसे कोणी गांभिर्याने घेतले जात नाही. पाण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा योजना फेल गेल्याने पाणी मिळेनासे झाले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com