
Jalna News : अंबड तालुक्यातील १४ गावात भीषण पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले आहे.यासाठी प्रशासनाकडून २१ टँकर व विहीर अधिग्रहण करत ग्रामस्थांची तहान भागविण्यासाठी पाऊले उचलली आहेत. अजून ही अनेक गावात भीषण पाणी टंचाईच्या झळा बसणे सुरू आहे.
ग्रामस्थांमधून ग्राम पंचायतीकडे टँकर व विहीर अधिग्रहण करण्याची मागणी जोर धरत आहे.यामुळे पुन्हा तहानलेली गाव व टँकर च्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.पावसाळा सुरू होण्यासाठी अजूनही दीड ते दोन महिने बाकी आहे.तोपर्यंत ग्रामस्थांना आपली तहान टँकरवर भागवावी लागणार आहे.तालुक्यात पावसाळ्यात कमी झालेले पर्जन्यमान यामुळे हिवाळ्यातच नद्या, ओढे, नाले पाण्यावाचून कोरडेठाक पडले होते. पाझर तलाव, लघु तलाव पाण्या अभावी कोरडे पडले आहे.
तर काही मध्ये शून्य टक्के जलसाठा शिल्लक आहे. मार्च महिन्यात विहिरींनी तळ गाठले आहे.यामुळे जलसाठाच शिल्लक नसल्याने ग्रामस्थांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. पाण्यासाठी सकाळी झोपेतून उठले की, पाण्याच्या शोधात दूर शेतात पायपीट करावी लागत आहे. डोक्यावर हंडे, घागर, हातात बकेट, काखेत लेकरू असा संघर्ष ग्रामस्थांना करावा लागत आहे. तालुक्यात मार्च पासून पाणी टंचाईचे सावट पसरले आहे.
तालुक्यातील नऊ गावच्या ग्रामपंचायतीने टँकर सुरू करण्यासाठी प्रस्ताव दाखल केल्याने एप्रिल महिन्यात तालुक्यातील किनगाववाडी, भिवंडीबोडखा, पिंपरखेड खुर्द, बक्षाचीवाडी, धनगरपिंपळगाव, दुनगाव येथे टाका, नांदी ,शिराढोण, बनगाव, बेलगाव, दहेगाव, चिकनगाव, मठजळगावसह आदी गावात पाण्याचे टँकर सुरू करण्यात आले आहेत.
तसेच विहिरीचे अधिग्रहण करण्यात आले आहे. प्रत्येक गावात एक तर दूनगाव येथे तीन टँकर सुरू करण्यात आले आहे. प्रशासनाच्यावतीने अंबड तालुक्यातील अनेक गावात टँकर सूरू करत विहिरीचे अधिग्रहण करण्यात आले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.