
Jalgaon News : खानदेशात तीळ पेरणी यंदा कमी झाली आहे. पेरणी डिसेंबर व जानेवारीत झाली आहे. या महिन्यातही काही भागात पेरणी झाली असून, खानदेशात यंदा सुमारे २२५ हेक्टरवर तीळ पीक आहे.
तेलबिया पिकांत खानदेशात रब्बीत किंवा उन्हाळ हंगामात भुईमूग व सूर्यफूल अधिक असते. तीळ पेरणी कमी असते. यंदा सूर्यफूल पेरणी पूर्ण झाली आहे. पेरणी अपेक्षेएवढी झालेली नाही, अशी स्थिती आहे. तीळ पेरणी या महिन्यातही काही शेतकऱ्यांनी केली आहे.
तीळ पेरणी डिसेंबरअखेरीस सुरू झाली. ती पेरणी या महिन्याच्या सुरुवातीलाही झाली. या महिन्यात मात्र काही भागात पेरणी झाली. तीळ पिकाची पेरणी खानदेशात मागील १५ ते १८ वर्षांपासून सतत कमी झाली आहे. पूर्वी तीळ पिकाची पेरणी पाच ते सहा हजार हेक्टरवर केली जात होती.
जेवढी पेरणी खरिपात केली जायची, तेवढीच पेरणी रब्बीतही शेतकरी करायचे. तीळ पिकाची पेरणी काळ्या कसदार जमिनीत अधिकची दिसत आहे. काळ्या कसदार जमिनीत तीळाचे उत्पादन एकरी दोन क्विंटलपेक्षा अधिक मिळते, असेही शेतकरी मानतात.
तीळ पिकासाठी जळगाव जिल्ह्यातील चोपडा, यावल, रावेर, अमळनेर, पाचोरा, जामनेर हा भाग प्रसिद्ध होता. धुळ्यातील शिरपूर, शिंदखेडा, नंदुरबारमधील तळोदा, शहादा, नंदुरबार भागातही तीळ पेरणीला शेतकरी पसंती द्यायचे. परंतु कमी दर, अल्प उत्पादन यामुळे पेरणी कमी होत गेली. रब्बीत किवा उन्हाळ हंगामात सुमारे ४०० हेक्टरवर तीळ पीक होते. आता मात्र तीळ पेरणी सुमारे २२५ हेक्टरवर झाल्याची माहिती आहे.
खरिपात दीड हजार हेक्टरवर तीळ पेरणी अपेक्षित होती. परंतु पेरणी ३०० हेक्टरवरच झाली आहे. जळगावमध्ये सुमारे १५० हेक्टरवर तीळ पीक आहे. तर धुळे, नंदुरबारमध्ये मिळून सुमारे ७५ हेक्टरवर तीळ पेरणी आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.