Sangli News : जिल्ह्यात ऑगस्टमध्ये महापूर, अतिवृष्टीचा फटका खरिपातील सोयाबीन, मका, भुईमूग यासह अन्य पिकांना बसला. मिरज, वाळवा, पलूस आणि शिराळा या चार तालुक्यांतील पुरामुळे शेतीपिकाचे ७ कोटी ४५ लाख ३७ हजार ९००० रुपयांचे नुकसान झाल्याचा अहवाल कृषी विभागाने तयार केला असून तो अहवाल वरिष्ठ पातळीवर सादर केला जाणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली..जिल्ह्यात ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापासून सर्वच तालुक्यांत दमदार पाऊस सुरू झाला. पलूस, वाळवा, मिरज आणि शिराळा या तालुक्यांत जोरदार पावसाने हजेरी लावली. दरम्यान या चारही तालुक्यांत संततधार पाऊस झाला. .Rain Crop Damage : अतिपावसाच्या तडाख्यात पिके धोक्यात.त्यातच वारणा आणि कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सलग अतिवृष्टी सुरू होती. त्यामुळे वारणा आणि कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केला. यामुळे वारणा आणि कृष्णा नदीला पूर परिस्थिती निर्माण झाली परिणामी नदीकाठची पिके पाण्याखाली गेली..या पावसामुळे सर्वाधिक मिरज तालुक्यातील पिकांचे नुकसान आले आहे. तर वाळवा तालुक्यात सर्वांत कमी नुकसान झाले. पावसाने उघडीप दिल्यानंतर कृषी विभागासह अन्य संबंधित विभागाने अतिवृष्टी आणि पुराने बाधित झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे सुरू केले..Rain Crop Damage: पाऊस सुरूच, उडीद पीक गेले हातचे.आठ ते दहा दिवसांत हे पंचनामे पूर्ण करण्यात आले. चार तालुक्यांतील १३ हजार ४७५ शेतकऱ्यांची ४ हजार ७४ हेक्टरवरील पिके बाधित झाली असून ७ कोटी ४५ लाखांचे नुकसान झाले आहे.पंचनाम्याचा नुकसानीचा अहवाल तयार झाला असून तो वरिष्ठ कार्यालयाकडे सादर केला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.