
रावसाहेब उगले
Nashik News : नाशिक : ‘टूबीएचके, श्रीबीएचके फ्लॅटला ताजमहल म्हणून फसू नको, दहा पाच गुंठ्याचं अंगण आहे, तुझ्या बापाच्या घराला, तू मात्र खुराड्यात जाऊन बसू नको.’ या कवितेच्या ओळी आहेत दिंडोरी तालुक्यातील चिंचखेडचे कवी प्रा. संदीप जगताप यांच्या.
शेतकरी कुटुंबातील मुलांशी विवाह करा, असे मुलींना आवाहन करणारी ही कविता वाचून जुन्नर तालुक्यातील एका मुलीने शेतकरी मुलाशी लग्न करण्यास होकार दिला आहे. ‘शेतकरी नवरा नको गं बाई’ म्हणणाऱ्यांच्या सध्याच्या जगात हा आशेचा एक किरण परिवर्तनाची नांदी ठरू शकतो.
‘मोबाइलवरच्या प्रा. संदीप जगताप अॅनिमेटेड पावसात कधीच कोणी भिजत नाही, शहरामधल्या पाचव्या मजल्यावर कुठलंच सुख रुजत नाही. रुजायच असल, भिजायच असल तर हवी असते माती अन् वरून खऱ्या खुऱ्या पावसाची सर, आयुष्य करायचं असलं हिरवगार तर पोरी, शेतकरी पोराशी लग्न कर..!’ असे म्हणत कवी जगताप यांनी शेतीचे जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व मुलींना पटवून दिले आहे. ही कविता ऐकून आणि वाचून शेतकऱ्यांची मुले त्यांच्या काळजातील व्यथा मांडल्याचे सांगत भावनांना वाट मोकळी करून देत आहेत.
कवितेच्या प्रत्येक शब्दात शेतकरी राजाचे वर्णन करत जगताप ‘शेतकऱ्याला कधीच नसतं पेन्शनचं टेन्शन कारण माती कधीच रिटायर होत नाही, पायलीभर पेरले की वर्षभराचे उगवून देते काळी आई’ हा दुर्दम्य आशावादही जागवितात.
आज प्रत्येक गावात किमान ३० ते ५० मुलांचे लग्नाचे वय उलटले आहे. मुलींची संख्या कमी आहे हे त्याचे कारण नाही तर त्यांची मानसिकता शेतकरी मुलांबाबत सकारात्मक नाही. या पार्श्वभूमीवर भविष्यात शेतीचे महत्त्व वाढणार असल्याचा संदेश कवी प्रा. जगताप यांनी या कवितेतून दिला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.