Rural Marriage Story : ‘मी शेतकरी मुलाशीच लग्न करणार’

Famer Youth Marriage Issue : ‘शेतकरी नवरा नको गं बाई’ म्हणणाऱ्यांच्या सध्याच्या जगात हा आशेचा एक किरण परिवर्तनाची नांदी ठरू शकतो.
Farmer Marriage Issue
Farmer Marriage Issue Agrowon
Published on
Updated on

रावसाहेब उगले

Nashik News : नाशिक : ‘टूबीएचके, श्रीबीएचके फ्लॅटला ताजमहल म्हणून फसू नको, दहा पाच गुंठ्याचं अंगण आहे, तुझ्या बापाच्या घराला, तू मात्र खुराड्यात जाऊन बसू नको.’ या कवितेच्या ओळी आहेत दिंडोरी तालुक्यातील चिंचखेडचे कवी प्रा. संदीप जगताप यांच्या.

शेतकरी कुटुंबातील मुलांशी विवाह करा, असे मुलींना आवाहन करणारी ही कविता वाचून जुन्नर तालुक्यातील एका मुलीने शेतकरी मुलाशी लग्न करण्यास होकार दिला आहे. ‘शेतकरी नवरा नको गं बाई’ म्हणणाऱ्यांच्या सध्याच्या जगात हा आशेचा एक किरण परिवर्तनाची नांदी ठरू शकतो.

‘मोबाइलवरच्या प्रा. संदीप जगताप अॅनिमेटेड पावसात कधीच कोणी भिजत नाही, शहरामधल्या पाचव्या मजल्यावर कुठलंच सुख रुजत नाही. रुजायच असल, भिजायच असल तर हवी असते माती अन् वरून खऱ्या खुऱ्या पावसाची सर, आयुष्य करायचं असलं हिरवगार तर पोरी, शेतकरी पोराशी लग्न कर..!’ असे म्हणत कवी जगताप यांनी शेतीचे जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व मुलींना पटवून दिले आहे. ही कविता ऐकून आणि वाचून शेतकऱ्यांची मुले त्यांच्या काळजातील व्यथा मांडल्याचे सांगत भावनांना वाट मोकळी करून देत आहेत.

Farmer Marriage Issue
Rural Marriage Crisis: ग्रामीण भागात लग्न जुळवणे झाले कठीण

कवितेच्या प्रत्येक शब्दात शेतकरी राजाचे वर्णन करत जगताप ‘शेतकऱ्याला कधीच नसतं पेन्शनचं टेन्शन कारण माती कधीच रिटायर होत नाही, पायलीभर पेरले की वर्षभराचे उगवून देते काळी आई’ हा दुर्दम्य आशावादही जागवितात.

Farmer Marriage Issue
Farmer Marriage Crisis: शेतकरी नवरा नको गं बाई! : ग्रामीण भागातील विवाहसंस्थेवरील संकट

आज प्रत्येक गावात किमान ३० ते ५० मुलांचे लग्नाचे वय उलटले आहे. मुलींची संख्या कमी आहे हे त्याचे कारण नाही तर त्यांची मानसिकता शेतकरी मुलांबाबत सकारात्मक नाही. या पार्श्वभूमीवर भविष्यात शेतीचे महत्त्व वाढणार असल्याचा संदेश कवी प्रा. जगताप यांनी या कवितेतून दिला आहे.

मधल्या काळामध्ये शेतीमध्ये सरकारच्या धोरणांनी जी वाताहात झाली, त्यामुळे शेतीबद्दल नकारात्मक दृष्टिकोन तयार झाला. त्याचा दुष्परिणाम आज प्रामाणिकपणे शेतामध्ये कष्ट करणारी मुले भोगत आहे. पण हा काळ संपणार आणि पुन्हा शेतीचेच दिवस येणार, हे सत्य आहे. म्हणून मुलींना आवाहन करणारी कविता मी लिहिली.
- प्रा. संदीप जगताप, कवी, चिंचखेड, जि. नाशिक
कवी प्रा. संदीप जगताप यांची ‘आयुष्य करायचं असेल हिरवंगार, तर पोरी शेतकरी पोराशी लग्न कर’ ही कविता मी ऐकली. त्यातून शेतीचे महत्त्व पटले. यामुळेच जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याच्या मुलाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.
- दामिनी, जुन्नर, शेतकरी मुलाशी लग्न करू इच्छिणारी मुलगी (नाव बदललेले आहे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com