Kolhapur Flood : पाण्यामुळे पिके कुजू लागली

Crop Damage : गेल्या आठ ते दहा दिवसांपासून पिके पुराच्या पाण्यात असल्याने ती कुजण्याचा धोका निर्माण झाला आहे.
Kolhapur Flood
Kolhapur Flood Agrowon
Published on
Updated on

Kolhapur / Sangli / Satara : गेल्या आठ ते दहा दिवसांपासून पिके पुराच्या पाण्यात असल्याने ती कुजण्याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे नुकसानीत प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी (ता. ३) नद्यांच्या पाण्यात चढ-उतार दुपारपर्यंत कायम होता. पंचगंगा नदीचे पाणी मंदगतीने ओसरत आहे.

राधानगरी धरणातून अजूनही तीन दरवाजातून विसर्ग होत असल्याने पाण्याची आवक कायम असल्याचे पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी सांगितले. कृष्णा नदी पाण्यात मंद उतार आहे. दूधगंगा नदीच्या पाण्यात धीम्या गतीने वाढ सुरू आहे.

Kolhapur Flood
Kolhapur Flood : हजारो हेक्टर शेती पाण्याखालीच

पंचगंगा नदीचे पाणी अजूनही इशारा पातळीपेक्षा जास्तच आहे. शनिवारी दुपारी दोन वाजेपर्यंत नदीची पातळी ४२.२ फुटावर होती. राधानगरी धरणातून अद्यापही ५००० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

कोयना धरणातून ५२००० क्यूसेक पाण्याचा विसर्ग कायम होता. वारणा व कृष्णा नदीच्या पाण्यात दोन ते तीन इंचा नी घट झाली, मात्र अद्यापही ज्या प्रमाणात पाणी ओसरायला हवे त्या प्रमाणात ते ओसरत नसल्याने चिंता कायम आहे.

नद्यांची पातळी दिवसाला घेऊन एक ते दोन इंच कमी होत आहे. अद्यापही ७६ बंधारे पाण्याखाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण ९७ मार्ग बंद असून, पूरबाधित क्षेत्रातील नुकसानीच्या पंचनाम्यांना गती आली आहे.

पावसामुळे धरणसाठ्यात वाढ झाल्याने कासारी, कडवी, पाटगाव, चित्री, आंबेओहोळ धरणातून विसर्ग वाढविण्यात आला आहे. कोल्हापूर शहरातील चित्रदुर्ग मठ, बापट कॅम्प व जाधववाडी या तीन निवारा केंद्रांत अद्याप ९४ पूरग्रस्त आहेत.

Kolhapur Flood
Kolhapur Flood : शिरोळ तालुक्यात महापुराच्या पाण्यात ट्रॅक्टर ट्रॉली पलटी, सरपंच पतीसह ७ जण गेले वाहून

अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग स्थिर आहे. धरणात पाण्याची आवक शनिवारपासून कमी झाली असून धरणातून विसर्ग ३ लाख क्युसेकने सुरू आहे. पाण्याची आवक आणि पाऊस यावर विसर्ग वाढवण्याबाबत चर्चा करून निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शनिवारी सकाळपासून धरणात पाण्याची आवक ३ लाख १९ हजार ९१६ क्युसेकने होत आहे. शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी २१ हजाराने धरणात पाण्याची आवक कमी झाली आहे.

साताऱ्यातील धरणांतून विसर्ग कायम

कोयनासह प्रमुख सहाही धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी जास्त होत असला तरी या सहा धरणांतून विसर्ग कायम आहे. कोयना धरणातून सर्वाधिक ५२,२०० क्युसेकने विसर्ग कोयना नदीपात्रात केला जात असल्याने नदी दुथडी भरून वाहत आहे. सहा प्रमुख धरणांतून ७६ हजार २१४ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

कोयनेच्या पाणलोट क्षेत्रातील कोयना ७८, नवजा ६० व महाबळेश्वर ९० मिलिमीटर पाऊस झाला आहे. धरणात ४८,६१२ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. शनिवारी सकाळी आठ वाजता कोयना धरणाच्या सांडव्यावरून ५०,००० व पायथा वीज गृहातून २१०० असा एकूण ५२,२०० क्युसेक नदी पात्रात केला जात आहे. तसेच धोम ७६२१, धोम-बलकवडी १३३७, कण्हेर ४८२६, उरमोडी ५४१४, तारळीमध्ये ४९१३ क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com