
Nagpur News : ‘ईव्हीएम हटवा, देश वाचवा’, ‘संविधान वाचवा, ईव्हीएम हटवा’, ‘ईव्हीएम सरकार हाय हाय’ अशा घोषणा विधानभवनाच्या पायऱ्यांवर देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकारवर हल्ला चढविला.
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनात नाना पटोले, विजय वडेट्टीवार, जितेंद्र आव्हाड, महेश सावंत, नितीन राऊत, भास्कर जाधव, भाई जगताप, विकास ठाकरे, अमित देशमुख, सतेज पाटील, अनिल चौधरी, अभिजित वंजारी, संजय मेश्राम, सचिन अहिर, सुधाकर अडबाले, संदीप क्षीरसागर, रोहित पाटील, वरुण सरदेसाई आदींची उपस्थिती होती.
विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर ईव्हीएमविरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. त्यानंतर विधानभवन परिसरातील प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना अंबादास दानवे म्हणाले, ‘ईव्हीएम हे लोकशाही, राज्यघटनेसाठी घातक आहे. विधानसभा निवडणुकीतील मतदानामध्ये ठिकठिकाणी जो घोळ झाला आहे, त्यावरून आमचा ईव्हीएमविरुद्ध रोष आहे. परिणामत: अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानभवन परिसरात आंदोलन करून ईव्हीएमविरोधी लढाई तीव्र करणार येईल.’
भाई जगताप म्हणाले, ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ईव्हीएम म्हणजे ‘एव्हरी व्होट फॉर महाराष्ट्र’ असे म्हणतात. प्रत्यक्षात ईव्हीएम म्हणजे ‘एव्हरी व्होट फॉर महायुती’ असे आहे. फडणवीस खोटारडे असून मी त्यांना फसवणीस असे नाव देतो.’ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये देखील भाजपकडून अशाच प्रकारच्या प्रणालीचा वापर होण्याची शक्यता आहे ती लक्षात घेता यापुढे सर्व मतदान हे बॅलेट पेपरच्या माध्यमातूनच घेण्यात यावी, अशी मागणी देखील जगताप यांनी केली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.