Marathwada Water Storage : मराठवाड्यात सप्टेंबरच्या पावसाने पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ

Water Stock : मराठवाड्यात सप्टेंबरच्या सुरुवातीला झालेल्या अति जोरदार पावसामुळे प्रकल्पांमधील पाणीसाठा झपाट्याने वाढला आहे.
Water Storage
Water StorageAgrowon
Published on
Updated on

Chh. Sambhajinagar News : मराठवाड्यात सप्टेंबरच्या सुरुवातीला झालेल्या अति जोरदार पावसामुळे प्रकल्पांमधील पाणीसाठा झपाट्याने वाढला आहे. एकूण ८७७ प्रकल्पांमध्ये आताच्या घडीला ८०.९७ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या वतीने देण्यात आली. मोठ्या अकरा प्रकल्पांपैकी सिद्धेश्‍वर आणि निम्न मनार तुडुंब झाले असून, परभणीतील दोन्ही मध्यम प्रकल्प पूर्णतः भरले आहेत.

माहितीनुसार, झालेल्या एकूण उपयुक्त पाणीसाठ्यामध्ये मोठ्या ११ प्रकल्पांतील ८८.६२ टक्के, मध्यम ७५ प्रकल्पांमधील ६८.८८ टक्के, ७४९ लघू प्रकल्पांमधील ६६.८३ टक्के, गोदावरी नदीवरील १५ बंधाऱ्यांमधील ६९.०२ टक्के, तर तेरणा, मांजरा, रेना नदीवरील २७ बंधाऱ्यांमधील ७०.९३ टक्के उपयुक्त पाणीसाठ्याचा समावेश आहे.

Water Storage
Khandesh Water Storage : खानदेशात जलसाठा स्थिर

मोठ्या ११ प्रकल्पांपैकी जायकवाडीत ९८ टक्के, येलदरीत ७७ टक्के, माजलगावमध्ये ४३ टक्के, मांजरात ७९ टक्के, ऊर्ध्व पैनगंगामध्ये ९८ टक्के, निम्नतीरणात ७७ टक्के, विष्णुपुरीत ९३ टक्के, निम्न दुधना ७५ टक्के, सीना काळेगावमध्ये ५३ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. याशिवाय सिद्धेश्‍वर आणि निम्न मनार हे दोन मोठे प्रकल्प तुडुंब झाले आहेत.

मध्यम प्रकल्पांपैकी छत्रपती संभाजीनगरमधील १६ मध्यम प्रकल्पात ४५ टक्के, जालन्यातील सात मध्यम प्रकल्पांत ४७ टक्के, बीडमधील १६ मध्यम प्रकल्पांत ९७ टक्के, लातूरमधील आठ मध्यम प्रकल्पांत ६९ टक्के, धाराशिवमधील १७ मध्यम प्रकल्पांत ५२ टक्के, नांदेडमधील नऊ मध्यम प्रकल्पांत ९७ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.

Water Storage
Water Storage : खडकपूर्णा, नळगंगा, पेनटाकळी यंदा तुडूंब

मराठवाड्यातील २८ मध्यम प्रकल्प तुडुंब झाले आहेत. लघू प्रकल्पांपैकी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ९८ लघू प्रकल्पात केवळ ४२ टक्के, जालन्यातील ५७ लघू प्रकल्पात ५५ टक्के, बीडमधील १२६ लघू प्रकल्पात ६९ टक्के, लातूरमधील १३४ लघू प्रकल्पात ८२ टक्के, धाराशिवमधील २०६ लघू प्रकल्पांत ५४ टक्के, नांदेडमधील ८० लघू प्रकल्पांत ९५ टक्क, परभणीतील २२ प्रकल्पांत ८८ टक्के, तर हिंगोलीतील २७ लघू प्रकल्पांत ९५ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.

आठ लघू प्रकल्प अजूनही कोरडे

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरमधील ७ व धाराशिवमधील १ मिळून आठ लघू प्रकल्प अजूनही कोरडेच आहेत. तब्बल ६७ लघू प्रकल्पांतील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधील १६, जालन्यातील ७, बीडमधील १२, लातूरमधील ४, धाराशिवमधील २७ व नांदेड मधील एका लघू प्रकल्पाचा समावेश आहे. याशिवाय ६ मध्यम प्रकल्पांतील पाणीसाठाही अजून जोत्याखालीच आहे. त्यामध्ये जालन्यातील २, धाराशिवमधील ३ व छत्रपती संभाजीनगरमधील एका मध्यम प्रकल्पाचा समावेश आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com