Raju Shetti : राजू शेट्टींच्या पदयात्रेतच 'जवाहर'ची साखर वाहतूक; ट्रकवर दगडफेक, वातावरण तापले

Jawahar Sakhar Karkhana : राजू शेट्टी यांची पदयात्रा जवाहर साखर कारखान्यावर येताच, कार्यकर्त्यांनी जोरजोरात घोषणा देत कारखाना परिसर दणाणून सोडला.
Raju Shetti
Raju Shettiagrowon
Published on
Updated on

Sugarcane Farmer : उसाचा दुसरा हप्ता ४०० रूपये प्रतिटन या व राज्यातील साखर कारखान्यांचे वजन काटे डिझीटल केल्याशिवाय यंदा गाळपास परवानगी देऊ नये, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या संस्थापक राजू शेट्टी १७ ऑक्टोबरपासून शिरोळ येथील दत्त साखर कारखान्यापासून आक्रोश पदयात्रा निघाली.

दुसऱ्या दिवशी ही पदयात्रा रांगोळी याठिकाणी पोहचली. सकाळी ८ वाजता हेरवाड येथून दुसऱ्या दिवशीच्या पदयात्रेस प्रारंभ होत अब्दुललाट, शिरदवाड, रांगोळी, हुपरी जवाहर साखर कारखाना, यळगूड व कसबा सांगाव ५३ किलोमीटर अंतर पार करून या मार्गावर ही पदयात्रा पोहचली.

सायंकाळी ५ वाजता ही पदयात्रा जवाहर साखर कारखान्यावर येताच, कार्यकर्त्यांनी जोरजोरात घोषणा देत कारखाना परिसर दणाणून सोडला. राजू शेट्टी यांनी कारखान्यावर सभा घेऊन कारखान्याचा हिशोब सांगून कशा पध्दतीने ४०० रूपये देता येतात याची मांडणी केली.

कधीही कारखान्यावर हिशोबास येण्यास तयार असल्याचे आवाहन दिले. त्याचपध्दतीने काटामारीचे प्रमाणही वाढल्याने सर्व काटे डिजिटल करून ॲानलाईन केल्याशिवाय हंगाम चालू होवू देणार नसल्याचे सांगितले.

दरम्यान अशातच जवाहर साखर कारखान्यातून साखरेचे वाहतूक करणारे ट्रक जात असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना समजली यावेळी स्वाभिमानीकडून ही साखर वाहतूक अडवली यावेळी या ट्रकवर दगडफेक झाल्याने काही काळ वातावरण तणावाचे बनले होते. यामुळे काही काळ गोंधळ उडाला. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करत ट्रक ड्रायव्हरला आत जाण्याचे आवाहन केले.

Raju Shetti
Raju Shetti News : ऊसाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी स्वाभिमानीचा 'आक्रोश', राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली शिरोळमधून पदयात्रेला सुरुवात

प्रत्येक गावात जल्लोषी स्वागत

दरम्यान प्रत्येक ठिकाणी घरटी भाकरी गोळा करून तेथील शेतकऱ्यांनी जेवणाची सोय केली आहे. प्रत्येक गावात पदयात्रेचे जल्लोषी स्वागत केले जात आहे. जोपर्यंत ४०० रूपयांचा हप्ता दिला जात नाही. तोपर्यंत एकाही साखर कारखान्याची ऊस तोड सुरू होणार नसल्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. पदयात्रेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सामील व्हावे, असे आवाहन शेट्टी यांनी केले आहे.

१७ ऑक्टोबर पासून पदयात्रा सुरू होऊन गुरूदत्त, जवाहर, घोरपडे, शाहू, वारणा, क्रांती, वसंतदादा, राजारामबापू आदी ३७ साखर कारखान्यांवर २२ दिवस ५२२ किमी पदयात्रा चालत जाऊन ७ नोव्हेंबर रोजी जयसिंगपूर येथील ऊस परिषदेत ही पदयात्रा सामील होणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com