Cotton Crop Damage : खानदेशात कापूस पिकाची पावसाने वाताहत

Rain Update : खरिपात खानदेशात कापूस प्रमुख पीक असून, अतिपावसाने पिकाची मोठी वाताहत झाली आहे. उत्पादनात घट येणार असून, बोंडे काळवंडली आहेत.
Cotton Crop
Cotton CropAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : खरिपात खानदेशात कापूस प्रमुख पीक असून, अतिपावसाने पिकाची मोठी वाताहत झाली आहे. उत्पादनात घट येणार असून, बोंडे काळवंडली आहेत. कापसाची सर्वाधिक लागवड खानदेशात केली जाते. राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत कापूस लागवडीत खानदेश आघाडीवर आहे. यात पूर्वहंगामी कापसाची देखील मोठ्या क्षेत्रात खानदेशात लागवड झाली आहे. ही लागवड मे अखेरीस व जूनच्या सुरुवातीला झाली.

खानदेशात कापसाची लागवड सुमारे आठ लाख हेक्टरवर झाली आहे. यात जळगाव जिल्ह्यात पाच लाख ११ हजार हेक्टरवर, धुळ्यात सुमारे दोन लाख हेक्टरवर आणि नंदुरबारात ९५ हजार हेक्टरवर कापूस पीक आहे. लागवडीत मागील हंगामाच्या तुलनेत घट झाली आहे. परंतु अन्य पिकांच्या तुलनेत कापूस पीक अधिक आहे. खरिपात खानदेशात एकूण १४ लाख हेक्टरवर विविध पिके असतात. यात एकट्या कापसाची आठ लाख हेक्टरवर लागवड आहे. त्यात पूर्वहंगामी कापसाची सुमारे दोन लाख हेक्टरवर लागवड झाली आहे.

Cotton Crop
Cotton Crop Damage : अतिपावसाने कापसाला कोंब

पूर्वहंगामी कापूस पिकात बोंडे उमलण्यास सुरुवात झाली. ऊनही मध्यंतरी तापले. त्यात बोंडे उमलण्याची गती वाढली. अशातच मागील आठवड्यात सर्वत्र जोरदार, अतिजोरदार, मध्यम व हलका पाऊस झाला. काही भागात अतिवृष्टीही झाली. दोन ते तीन तास जोरदार पाऊस जळगावसह चोपडा, जामनेर, पाचोरा, धुळ्यातील धुळे, साक्री, नंदुरबारातील नवापूर, नंदुरबार आदी भागात झाला. अतिपावसाने खानदेशात सर्वाधिक फटका कापूस, सोयाबीन, मका या पिकांना बसला आहे. मध्यंतरी उडीद, मूग पिकेही पावसाने हातची गेली.

खानदेशात अतिपावसाने सुमारे २५ ते ३० हजार हेक्टरवरील कापसाची हानी झाली आहे. पाऊस सुरूच राहिल्यास नुकसान पातळी ४० टक्क्यांवर जाईल, अशीही स्थिती आहे. पावसाने अनेक भागांत कापूस पीक लाल-पिवळे झाले आहे. त्याची वाढ थांबली आहे. फूल-पाते गळ सुरू आहे.

Cotton Crop
Cotton Crop Damage : सततच्या पावसामुळे कपाशीची बोंडे काळवंडली

बोंडे काळवंडली

पावसाने उमललेली बोंडे काळवंडली आहेत. ती ओली होऊन त्यांचा दर्जा घसरला आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. बोंडे वेचणी करून ती वाळवावी लागतात. परंतु नीरभ्र वातावरण नाही. मध्येच ढगाळ वातावरण तयार होते. पावसाची भीती कायम आहे. यात वेचणीही रखडत सुरू आहे. याचाही फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

काळ्या कसदार जमिनीत समस्या अधिक

काळी कसदार जमीन पाण्याचा निचरा फारसा करीत नाही. यात सतत पाऊस असल्याने या जमिनीत वाफसा नाहीसा झालेला नव्हता. अशात जोरदार पावसाने पाणीच पाणी झाले. या जमिनीत कापूस वेचणी करताना मजुरांना अधिकचा त्रास वाफसा नसल्याने होतो. यामुळे मजूर कापूस वेचणीला नाक मुरडतात. मजुरी अधिक मागतात. याचाही फटका शेतकरी सहन करीत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com