Amba Falgal Upay: यंदा हवामानातील बदलांमुळे आधीच मोहोर करपला आणि आता ऐन मार्च महिन्यात राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. हापूस आंबा सध्या वाढीच्या अवस्थेत आहे तर गावरान आंबा आणि केशर आंबा हा वाटाणा -गोटी अंडाकृती आकाराच्या अवस्थेत आहे. अवकाळी पावसामुळे आंब्यावर कीड रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. परंतु शेतकऱ्यांनी वेळेत नियोजन केल्यास नुकसान कमी करता येते..नक्की काय होतो परिणामअचानक झालेल्या पाऊस आणि गारपिटीमुळे मुख्यत: झाडावरची फळं गळून पडतात. आंब्यावर कीड रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. यामध्ये फळांवर फळमाशीचा आणि अँथ्रॅकनोज रोग उद्भवतो. तर दमट हवामानामुळे फळांवर करपा रोग होण्याची शक्यता असते. तसेच ऊन सावलीच्या या बदलांमध्ये वाढीच्या अवस्थेतील आंबे तडकतात. या सगळ्यापासून आंब्यांचा बचाव करण्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ आणि प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, दापोली यांनी माहिती आहे. त्याच्या मदतीने शेतकरी आंब्याचे रक्षण करु शकतात..Unseasonal Rain in Summer : अवकाळी पावसात पिकांचे व्यवस्थापन कसे करावे?.परिपक्व फळांची काढणीपावसामुळे फळांची पडझड होते, त्यामुळे परिपक्व फळांची लवकर काढणी करावी. हापूस आंब्याची झाडांवर पूर्ण वाढ झालेली व काढणीयोग्य फळे शक्य तितक्या लवकर तोडावीत, जेणेकरून त्यांच्यावर फळमाशीचा प्रादुर्भाव होणार नाही. गळून पडलेली फळे नष्ट करावीत. बागेत पडलेली किंवा खराब झालेली फळे त्वरित गोळा करून नष्ट करावीत. ही फळे फळमाशीच्या अळ्यांचे वाढण्याचे ठिकाण बनू शकतात..सापळ्यांचा वापरजी फळे वाढीच्या अवस्थेत आहेत किंवा पाडाच्या अवस्थेत आहे, अशा ठिकाणी बागेमध्ये फळमाशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता पावसामुळे वाढते. फळमाशी ही ढगाळ हवामानात जास्त वाढते. त्यामुळे बागेत कामगंध सापळे लावून फळमाशीचे नियंत्रण करावे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाने शिफारस केलेले फळमाशी रक्षक सापळे प्रति एकर २ या प्रमाणात बागेत झाडांच्या फांद्यांवर लावावेत..Avakali Paus: अवकाळी पावसाचा इशारा! फळबागांचे नुकसान टाळण्यासाठी करा तातडीचे व्यवस्थापन.अँथ्रॅक्नोज आणि करपा रोगाचे व्यवस्थापनपावसाच्या थेंबांमुळे फळांवर बुरशीजन्य अँथ्रॅक्नोज रोग येण्याची शक्यता असते. त्यासाठी मॅन्कोझेब किंवा कार्बेन्डाझिम या बुरशीनाशकांची शिफारसीनुसार फवारणी करावी. आंब्याच्या जातीनुसार शेतकऱ्यांनी तज्ज्ञांकडून सल्ला घ्यावा. सकाळच्या धुक्यामुळे व दमट हवामानामुळे फळांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. प्रादुर्भाव दिसून आल्यास ०.१% कार्बेन्डाझिम म्हणजेच १० ग्रॅम प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी..फ्रुट कव्हरआंबा फळांचे फळमाशी पासून तसेच पाऊस, गारपीट आणि प्रखर सूर्यप्रकाशापासून संरक्षण करण्यासाठी फ्रुट कव्हर फायदेशीर ठरतात. तसेच फळांचा आकार व वजन वाढून डाग विरहीत आंब्याच्या उत्पादनासाठी फ्रुट कव्हर लावावे. त्यासाठी गोटी ते अंडाकृती आकाराच्या आंबा फळांना २५ बाय २० सें.मी. आकाराच्या कागदी किंवा वर्तमानपत्रापासून बनविलेल्या पिशव्यांचे आवरण घालावे. आवरण घालताना फळाच्या देठाकडे इजा होणार नाही याची काळजी घ्यावी..फळे तडकू नये म्हणून..अवकाळी पाऊस किंवा कधी कधी प्रखर सूर्यप्रकाशामुळे आंबा पिकामध्ये फळे तडकण्याचे प्रमाण वाढते. ते कमी करण्यासाठी पाण्यात विरघळणारा बोरॅक्स (बोरॉन) ०.२५% द्रावणाची म्हणजेच २.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी फवारणी करावी. ही शिफारस डॉ. बा.सा.को.कृ. विद्यापीठाच्या अनुभवाधारित निष्कर्षांवर आधारित आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.