Alibaug News : तालुक्यातील उमटे धरणाच्या भिंतीला भगदाड पडले आहे. तसेच मोठ्या प्रमाणात गाळही साचला आहे. या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच बैठक घेत धरणाचे मजबुतीकरण तसेच गाळ काढण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले होते. यानुसार रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी शुक्रवारी (ता.२१) उमटे धरणाची पाहणी केली.
पाहणी दौऱ्यात उमटे धरणाच्या भिंतीला पडलेले भगदाडाची तातडीने डागडुजी करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून त्यासाठी आवश्यक निधी जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. धरणाच्या पाण्यावर ४७ गावे व ३३ आदिवासी वाड्या अवलंबून आहेत. उमटे धरणाला तब्बल ४१ वर्षे झाली असून देखभाल-दुरस्तीअभावी सध्या दुरवस्था झाली आहे.
धरणाच्या बाह्य बाजूकडील भिंतीचे दगड मोठ्या संख्येने निखळले आहेत. गाळ साचल्याने पाणी साठवण क्षमताही कमी झाली आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, मंत्रालयात बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीला खासदार सुनील तटकरे, आमदार महेंद्र दळवी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी धरणाचे मजबुतीकरण करणे तसेच गाळ काढण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देत याबाबत प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश देण्यात आले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.