
Satara News : जिल्ह्यात गेल्या आठवडाभरात झालेल्या मॉन्सूनपूर्व पावसामुळे सात तालुक्यांतील २१३.७९ हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान झाले आहे. १०.९५ हेक्टर क्षेत्रावरील फळबागा बाधित झाल्या आहेत.
प्राथमिक अंदाजानुसार ५९.०२ लाखांचे शेतीचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे. सध्या नुकसानीच्या पंचनाम्याचे काम सुरू असून या नुकसानीत आणखी वाढ होणार आहे.
जिल्ह्यात झालेल्या मॉन्सूनपूर्व पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सात दिवस मुसळधार पाऊस कोसळत होता. आता पावसाने उसंत घेतली असली तरी मॉन्सून पेरणीपूर्व मशागतीची कामे आणखी आठ दिवस सुरू होण्याची शक्यता नाही. या पावसामुळे सात तालुक्यांतील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
यामध्ये पश्चिमेकडील पाटण, सातारा आणि वाई तसेच कोरेगाव यासह पूर्वेकडील माण, खटाव, फलटण, तालुक्यांचा समावेश आहे.
यामध्ये २१३.७९ हेक्टरवरील शेती बाधित झाली आहे. यामध्ये भुईमूग, भाजीपाला, टोमॅटो, कांदा, ढोबळी मिरची, ज्वारी या पिकांचा समावेश आहे.
तसेच १०.९५ हेक्टरवरील फळबागेचे नुकसान झाले आहे. यामध्ये आंबा डाळिंब आणि पपई बागांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. या या नुकसानीचा ७८९ शेतकऱ्यांना फटका बसला आहे.
सध्या कृषी विभागाकडून हे नुकसानीचे पंचनामाचे काम सुरू असून आणखी चार आठ दिवस हे पंचनामे चालणार आहेत त्यानंतर नुकसानीच्या आकडेवारीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
नुकसानीची स्थिती अशी
११६५ घरांची पडझड
२६ लहान मोठी जनावरे मृत
१५० कोंबड्यांचा मृत्यू
२ शेतकऱ्यांचा मृत्यू
५० मंडलांत ६५ मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.