
Akola News : या महिन्यात होत असलेल्या मॉन्सूनपूर्व पावसाने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची झोप उडवली आहे. ताणावर सोडलेल्या संत्रा बागांवर या पावसाचा प्रतिकूल परिणाम होत असून, बहार फुटण्यात अडथळे निर्माण होण्याची भीती मांडत आहेत. तर तज्ज्ञ सध्या फारसे नुकसान होणार नाही, असा दावा करीत आहेत.
संत्र्याचा आगामी बहार धरण्यासाठी शेतकरी एप्रिल-मे महिन्यात झाडांना विश्रांती देऊन ‘ताण’ देत असतात. या काळात बागेचे पाणी पूर्णतः बंद करतात. चांगला ताण बसला तर जून-जुलैमध्ये झाडांवर बहार येतो आणि नंतर फळधारणा होते. मात्र, यंदाचा एप्रिल-मे महिन्यातील पाऊस हे ताणचक्र बिघडवत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.
बागांमध्ये ओलावा वाढला तर झाडांना अपेक्षित प्रमाणात ताण बसणार नाही. परिणामी फुलोऱ्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. संत्रा बागा ताणावर सोडत व्यवस्थापन केले होते. पश्चिम विदर्भात प्रामुख्याने मेहकर, रिसोडच्या काही भागात पाऊस झाला.
यामुळे भारी जमिनीत संत्रा बागा फुटणार नाहीत, असे शेतकरी सांगत आहेत. यंदा संत्रा बागांनी चांगले उत्पादन दिले. बाजारपेठेत दरही चांगले मिळाले. त्यामुळे शेतकरी आगामी बहार नियोजनात कुठलीही काटकसर न ठेवता तयारीला लागलेले आहेत. अशातच या पावसामुळे थोडा चिंतेचा सूर उमटत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.