
Washim News : जिल्ह्यात एकीकडे भुईमूग काढणीचा हंगाम जोरावर असताना याच काळात मॉन्सूनपूर्व पाऊस धुमाकूळ घालत असल्याने या पिकाचे अतोनात नुकसान होत आहे. काढणी झालेला भुईमूग भिजल्याने शेंगा काळ्या पडत आहेत. तर अचानक येणाऱ्या पावसात तयार झालेला भुईमूग झाकण्यासाठी शेतकऱ्यांना धावपळ करावी लागते आहे. पावसामुळे भुईमूग काढण्यावरही परिणाम होत आहे.
जिल्ह्यात भुईमूग पिकाची काढणी १५ दिवसांपासून सुरू झाली आहे. मात्र अचानक आलेल्या मॉन्सूनपूर्व पावसामुळे शेंगा भिजल्या असून त्या काळ्या पडू लागल्या आहेत. परिणामी भुईमुगाच्या दर्जावर परिणाम होऊन बाजारभावात मोठी घट येण्याची शक्यता आहे. याशिवाय शेंगा वाळवण्यासाठी लागणाऱ्या उन्हाचा अभाव असल्यामुळे शेतकऱ्यांना शेंगा वाळवण्यात मोठ्या अडचणी येत आहेत.
भुईमूग पीक या वर्षी चांगले आले होते. पण अचानक पावसामुळे शेंगा भिजल्या आणि त्या आता कुजण्याच्या अवस्थेत आहेत. बाजारात विक्रीसाठीसुद्धा नेणे कठीण झाले आहे. पावसामुळे जमीन ओलसर असल्याने काढणी केलेली भुईमूग साठवून ठेवणे अवघड झाले आहे. अनेक शेतकरी आपापल्या परीने प्लॅस्टिकचा वापर करून शेंगा झाकून ठेवत आहेत, पण दमटपणामुळे त्यातही शेंगा खराब होण्याचा धोका वाढला आहे.
दररोज शेतकरी झाकून ठेवलेल्या शेंगा वाळवण्याचा प्रयत्न करतात. थोडावेळ उन्हात वाळलेल्या शेंगा पावसाचा धोका पाहत पुन्हा झाकण्याची कसरत करावी लागते. मॉन्सूनपूर्व पावसाचा फटका वाशीम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसला असून विशेषतः भुईमूग उत्पादक संकटात सापडले आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.