
Nagar News : देशात २०२४ च्या निवडणुकीपूर्वीच समान नागरी कायदा लागू होण्याची शक्यता आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. सी. आर. राव यांचा भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्ष राज्यात आला आहे, मात्र त्याचा कोणताही परिणाम एनडीएवर होणार नाही, असा विश्वास केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला.
मंत्री आठवले मंगळवारी (ता. २७) नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता शहरात पत्रकारांशी बोलत होते.
आठवले म्हणाले, की तेलंगणाचे मुख्यमंत्री राव यांच्या पक्षाकडे पैसा आहे म्हणूनच ते त्याचा वापर करत आहेत. मात्र, त्याचा कोणताही परिणाम राज्यात होणार नाही. आम्ही जर त्यांच्या राज्यात गेलो व बॅनर लावले तर काय होईल, असा सवाल आठवले यांनी यावेळी उपस्थित केला. राव यांचा पक्ष ही भाजपची बी टीम नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
देशामध्ये समान नागरी कायदा झाला पाहिजे, ही सगळ्यांची भावना आहे. हा कायदा मुस्लिमांच्या विरोधात नाही. मात्र, त्याचा काहींनी बागुलबुवा उभा केला आहे. ते चुकीचे आहे.
सरकारने आता हरकती मागविलेल्या आहेत. हा देश एकसमान राहावा, इथे सर्व जण गुण्यागोविंदाने नांदावेत, हीच एक भावना आहे. त्यामुळे येणाऱ्या २०२४ च्या निवडणुकीच्या आधीच हा कायदा लागू होण्याची शक्यता असल्याचे आठवले यांनी सांगितले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.