Union Budget 2024 : केंद्राने शेतकऱ्यांसह महाराष्ट्राला दाखविला ठेंगा

Agriculture Budget : लोकसभा निवडणुकीत भाजपला नाकारल्याने केंद्र सरकाने महाराष्ट्राला ठेंगा दाखविला आहे.
Union Budget 2024
Union Budget 2024Agrowon
Published on
Updated on

Pune News : लोकसभा निवडणुकीत भाजपला नाकारल्याने केंद्र सरकाने महाराष्ट्राला ठेंगा दाखविला आहे. दुसरीकडे अर्थसंकल्पाने सर्वच घटकांची घोर निराशा केली असून शेतकऱ्यांना उलटे मारण्याचे केंद्राचे धोरण असल्याची टीका शेतकरी नेत्यांसह विरोधी पक्षांतील नेत्यांनी केली आहे. तर शेतकऱ्यांना बळ देणारा अर्थसंकल्प असल्याचे सत्ताधारी पक्षांतील नेत्यांचे म्हणणे आहे.

शेतकऱ्यांना बळ

गरीब, महिला, युवा, शेतकरी या घटकांवर भर देतानाच कृषी व संलग्न क्षेत्रांसाठी १.५२ लाख कोटींची तरतूद केली आहे. शेती क्षेत्रातील उत्पादकता वाढविण्यासाठी डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर पुरविण्याचा निर्णय हा कृषी क्षेत्राबरोबरच शेतकऱ्यांना बळ देणारा आहे. त्याचबरोबर एक कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसाठी प्रोत्साहन देण्याचा निर्णय हा काळाची गरज आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Union Budget 2024
Union Budget 2024 : ३०० युनिटपर्यंत मोफत वीज, पीएम सूर्यघर योजनेला बजेटमध्ये 'बूस्ट'

भविष्याचा वेध घेणारा अर्थसंकल्प

हा भविष्याचा वेध घेणारा अर्थसंकल्प असून तो देशातील युवा, गरीब आणि शेतकऱ्यांना डोळ्यांसमोर ठेवून सादर केला आहे. अनेक प्रगत देश अर्थव्यवस्थेशी झुंजत आहेत. अशा परिस्थितीत भारताने ८.२ टक्क्यांची वाढ दाखवली आहे. ही वाढ भारताच्या अर्थव्यवस्थेच्या ताकदीचा अनुभव करुण देणारी आहे. २०२३-२४ मध्ये सामाजिक क्षेत्राचा खर्च दुप्पट झाला असून तो जवळपास ११ लाख कोटी वरून २३ लाख कोटींवर गेला आहे.

देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

शेतीसाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढेल

१.५२ लाख कोटींच्या तरतुदीतून शेती क्षेत्रासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यात येईल. कमी खर्चात, अधिक उत्पादन देणाऱ्या शास्त्रशुद्ध शेतीचा प्रचार-प्रसार देशाच्या शेतीक्षेत्राला आणि शेतकऱ्यांना बळ देणारा ठरेल. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेची मुदत ५ वर्षांसाठी वाढविण्यात आली आहे. त्यामुळे देशातील ८० कोटी नागरिकांना अन्नसुरक्षा मिळाली आहे.

अजित पवार, उपमुख्यमंत्री

Union Budget 2024
Union Budget 2024 : शेतकरी, युवक, महिला, गरिबांना केंद्राच्या बजेटमध्ये काय मिळालं?

महाराष्ट्राला ठेंगा दाखविला

महाराष्ट्रात केंद्र सरकारच्या लाडक्या महायुतीचे सरकार असताना महाराष्ट्राला पर्यायाने महायुतीला अर्थसंकल्पात ठेंगा दाखविला आहे. काँग्रेसच्या न्याय पत्राची उचलेगिरी अर्थसंकल्पात दिसून आली आहे. शेतकऱ्यांसाठी विशेष कोणतीही तरतूद नाही. महाराष्ट्रातील कापूस, संत्रा, धान, कांदा, सोयाबीन, दूध उत्पादकांचा केंद्र सरकारला विसर पडल्याचे आता लपून राहिलेले नाही. केंद्राचे गोडवे गाणाऱ्या महायुतीने महाराष्ट्रासाठी काय आणले याचा हिशेब जनतेला द्यावा.

विजय वडेट्टीवार, विरोधी पक्षनेते, विधान परिषद

ॲग्रो विशेष

महाराष्ट्राने मतदान न केल्याचा काढला वचपा

अवघ्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राला देशाचा पॉवर हाऊस म्हणून संबोधणाऱ्या पंतप्रधानांनी राज्यात त्यांचे सरकार असताना सर्वाधिक कर देणाऱ्या महाराष्ट्राच्या हातावर तुरी दिल्या आहेत. ५ ट्रिलियनच्या गोलच्या नावाखाली महाराष्ट्राला केंद्राने गोल-गोल फिरवून लांब फेकले आहे. इथल्या जनतेने भाजपला मतदान केले नाही, याचा जणू वचपाच केंद्राने काढलेला दिसतोय.

अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते, विधान परिषद.

सर्व घटकांची घोर निराशा

शेतकऱ्यांना दिलासा देणारी एकही योजना अर्थसंकल्पात दिसत नाही. महागाईने त्रस्त जनतेला दिलासा देण्यासंदर्भात तरतूद नाही. एनडीए सरकारच्या अर्थसंकल्पाने सर्व घटकांची घोर निराशा केली. शेतकरी, महिला, तरुण, विद्यार्थी, लघू, छोट्या व मध्यम उद्योगांसह सर्वसामान्यांची निराशा केली आहे.

नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com