Agriculture Irrigation : जायकवाडी डाव्या कालव्यासह वितरण प्रणालीची दुरवस्था

Jaykwadi Irrigation : परभणी जिल्ह्यात जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यासह वितरण प्रणालीतील उपकालवे, चाऱ्या वितरकांची दुरवस्था झाली आहे.
Agriculture Irrigation
Agriculture IrrigationAgrowon
Published on
Updated on

Parbhani News : परभणी जिल्ह्यात जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यासह वितरण प्रणालीतील उपकालवे, चाऱ्या वितरकांची दुरवस्था झाली आहे. परिणामी, पाण्याची नासाडी होत आहे. कालव्याच्या शेवटच्या टोकाकडील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळत नाही. जास्तीतजास्त क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी कालव्यासह वितरण प्रणालीची दुरुस्ती करण्याची गरज आहे.

जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्याचे सर्वाधिक लाभक्षेत्र हे परभणी जिल्ह्यात आहे. या मुख्य कालव्याच्या १२२ ते २०८ किलोमीटर (एकूण ८६ किलोमीटर) वितरण प्रणाली अंतर्गत शाखा कालवे, वितरिका, शेतचाऱ्यांचे जाळे आहे. जिल्ह्यातील पाथरी, मानवत, परभणी, पूर्णा, गंगाखेड या ५ तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी लाभ होतो. एकूण ९७ हजार ४०० हेक्टर लाभक्षेत्र आहे.

Agriculture Irrigation
Agriculture Irrigation : सिंचन योजनेतून शेतीसाठी २१ टीएमसी पाणी

परंतु मागील अनेक वर्षांत मुख्य कालव्याच्या अस्तरीकरणाची अनेक ठिकाणी तुटफूट झाली आहे. जागोजागी फरश्या निखळून पडल्या आहेत. गाळ जमा झाला आहे. झाडाझुडपांची वाढ झाली. त्यामुळे प्रवाहात अडथळे निर्माण झाले आहेत. अनेक ठिकाणी अतिक्रमण केल्यामुळे वितरिका,चाऱ्यांचे अस्तित्व दिसत नाही. कालव्याचा शेवटच्या टोकापर्यंतच्या शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहचत नाही.

कालवा उपसा, विहीर उपसा, नदी नाले उपसा, बंधारे उपसा मिळून एकूण ८२ हजार ८९४ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले होते. गतवर्षी (२०२३) धरणात अपुरा पाणीसाठा होता. त्यामुळे कालवा प्रवाही पद्धतीने १० हजार ८५९ हेक्टर क्षेत्र भिजले होते. या वर्षी जायकवाडी धरणामध्ये पुरेसा पाणीसाठा आहे.

Agriculture Irrigation
Agriculture Irrigation : चिंचोलीचे शेतकरी सिंचनापासून वंचित

त्यामुळे डाव्या कालव्याव्दारे यंदाच्या (२०२४-२५) रब्बी व उन्हाळी हंगामातील पिकांच्या सिंचनासाठी पाणी आवर्तने मिळणार आहेत. परंतु अद्याप वेळापत्रक जाहीर झालेले नाही. कालव्याच्या शेवटच्या टोकाकडील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळण्यासाठी मुख्य कालवा तसेच चाऱ्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

आमच्या भागातील कालव्याच्या जागोजागी फरश्या निघाल्या आहेत. झाडेझुडपे, गवत वाढले आहे. गाळ जमा झाला आहे. वितरकांची दुरवस्था झाल्यामुळे आमच्या गावापुढील वझूर येथील शेतकऱ्यांना पुरेसे पाणी मिळत नाही. थातुरमातुर दुरुस्ती केली जाते. परंतु सर्व शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही.
बाबासाहेब रन्हेर, बाभळगाव, ता. पाथरी, जि. परभणी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com