
Akola News : महाराष्ट्र सरकारची ‘गाळमुक्त धरण आणि गाळ युक्त शिवार’ ही योजना लोकचळवळ करण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी भारतीय जैन संघटनेच्या वतीने आणि सुहाना मसाले यांच्या सहकार्याने अकोला जिल्ह्यात प्रचाररथ फिरविण्यात येणार आहे.
या प्रचार रथाचा प्रारंभ जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्याहस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला. यावेळी जिल्हा जलसंधारण अधिकारी अमोल मस्कर, भारतीय जैन संघटनेचे या प्रकल्पाचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुभाष गादिया, समीप इंदाने, नरेश चौधरी, बीजेएसच्या महिला जिल्हाध्यक्ष ममता जैन, बीजेएसचे महानगर अध्यक्ष विमल जैन, माजी नगरसेविका उषा विरक, रवी जैन, रमेश तोरावत, राजेश सोनी, संजय महाजन, सचिन पारेख, मंजू जैन , चैताली साखरे,माधुरी बोडखे, गीता बाली उनवणे, तुषार हांडे, जलसंधारण विभागाचे चंद्रशेखर खंडेराव, संजय कुंभरे, शुभम गाडगे बीजेएसचे जिल्हा समन्वयक विष्णू गव्हाळे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रिम प्रोजेक्ट असलेली गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार ही योजना राबविण्यात येत आहे. ही योजना तळागाळापर्यंत नेण्यासाठी भारतीय जैन संघटना आणि महाराष्ट्र सरकारमध्ये एक सामंजस्य करार करण्यात आला आहे.
या सामंजस्य करारानुसार शासनाची ही योजना प्रत्येक गावापर्यंत नेवून धरण आणि बंधाऱ्यातील गाळ काढणे, नाल्यांचे खोलीकरण आणि रूंदीकरण करण्यासाठी मागणी निर्माण करण्याचे कार्य भारतीय जैन संघटना करीत आहे. याच योजनेचा एक भाग म्हणून प्रचार रथाचा प्रारंभ करण्यात आला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.