Ratnagiri News : राजापूर, जि. रत्नागिरी ः चिरेखाण फाटा ते जानशी पठार या परिसरातील कातळ परिसरात राधेश्याम पांडे यांनी विकसित केलेल्या आंबा बागेमध्ये सुमारे दोन गुंठे जागेमध्ये त्यांनी आंतरपीक म्हणून सुरणाची शेती केली आहे.
गेल्या चार वर्षांत सुमारे ५०० किलोंहून अधिक सुरण उत्पादन त्यांनी घेतले आहे. विशेष म्हणजे त्यांना काही दिवसांपूर्वी तब्बल १८ किलो ७०० ग्रॅम वजनाचा सुरण मिळाला आहे.
श्री. पांडे हे सेवानिवृत्त शिक्षक आहेत. शेतीच्या आवडीतून त्यांनी घराशेजारील शेतात हापूस आंबा बाग लावलेली आहे.
त्यातील सुमारे दोन गुंठे जागेत त्यांनी सुरणची लागवड केली आहे. दर्जेदार आणि चांगले उत्पादन मिळावे आणि जमिनीचा कस कायम राहण्यासाठी त्यांनी माती, गवत, शेणखत, राख आदीचा उपयोग करून शेती फुलविली.
सुरण लागवडीतून त्यांनी सुमारे ५०० हून अधिक किलो सुरण उत्पादन घेतले आहे. त्यास सरासरी ४० ते ६० रुपये प्रति किलो दर मिळाला आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.