
Nagpur News : अरबी समुद्रात आलेल्या ‘फेइंजल’ चक्रीवादळामुळे शहरात ढगाळ वातावरण आहे. शेतकऱ्यांनी धान्य विक्रीसाठी कळमन्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत आणले आहे.
धान ठेवण्यासाठी आच्छादन असलेले डोम नसल्याने हजारो पोत्यांमध्ये भरलेले लाखो क्विंटल धान मार्केटमध्ये उघड्यावर आहे. अशातच पावसाने हजेरी लावल्यास लाखोंचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
कळमना येथील कृषी उत्पन्न बाजार समिती मध्य भारतातील सर्वांत मोठी बाजारपेठ आहे. या बाजारात विदर्भातील अनेक जिल्ह्यांतील माल विक्रीसाठी येतो. अडत्यांच्या माध्यमातून व्यापाऱ्यांना धान विकले जाते.
शेतकरी अपेक्षित भाव मिळावा म्हणून माल बाजार समितीतच पुढे काही दिवस ठेवतो. सध्या कळमना बाजारात धानाची आवक सुरू आहे. किमान १० हजारांवर धानाची पोती सध्या बाजारात उघड्यावर आहेत.
सध्या दक्षिण भारतात जोरदार पाऊस सुरू आहे. गडचिरोली, चंद्रपूर व यवतमाळ भागांत तुरळक पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. हवामान खात्याचा अंदाज नागपुरात नसला तरी ढगाळ वातावरणामुळे पावसाची भीती आहे.
तीन वर्षांपूर्वी याच मोसमात अवकाळी पाऊस झाला होता आणि मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या धानाचे नुकसान झाले होते. सध्या कळमन्याच्या वाहनाच्या पार्किंग परिसरात धान साठविले जात आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.