Paddy Farm : मोकाट जनावरांमुळे भातशेती धोक्यात

Agriculture News : डहाणू तालुक्यात खरीप हंगामात १५ हजार हेक्टर जमिनीवर भातशेती केली जाते; तर उन्हाळी हंगामात सूर्या धरणाच्या उजव्या आणि डाव्या कालव्याच्या पाण्यावर परिसरातील ४० ते ४५ गावातील शेतकरी जवळपास सुमारे साडेचार हजार हेक्टर जमिनीवर भात शेती करतात.
Animals
AnimalsAgrowon
Published on
Updated on

Farmer News Maharashtra : मोकाट गुरांचा उपद्रव वाढल्याने डहाणू तालुक्यातील ८५ गावातील हजारो एकर जमीन ओसाड आहे. डहाणू तालुक्यात खरीप हंगामात १५ हजार हेक्टर जमिनीवर भातशेती केली जाते; तर उन्हाळी हंगामात सूर्या धरणाच्या उजव्या आणि डाव्या कालव्याच्या पाण्यावर परिसरातील ४० ते ४५ गावातील शेतकरी जवळपास सुमारे साडेचार हजार हेक्टर जमिनीवर भात शेती करतात.

ज्या भागात या शेतीला कुंपण करण्याची व्यवस्था आहे, ते सधन शेतकरी दरवर्षी शेती करतात. मात्र अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीमुळे शेतीला कुंपण करणे शक्य नाही. त्यामुळे शेतीचे मोकाट गुरांपासून नुकसान होत असल्याने अनेक वर्षांपासून ओसाड पडली आहे.

हरित क्रांतीमुळे शेतकऱ्यांनी उन्हाळी भात शेती करून अन्नधान्य साठा वाढवण्यात मोलाचे योगदान दिले होते. यात बोर्डी, चिंचणी, कासा वगैरे भागातील गावांचा उल्लेख करावा लागेल. मात्र डहाणू तालुक्याच्या पश्चिम पूर्व भागात मोकाट जनावरांचा उपद्रव हा शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

यावर शासनाने युद्धपातळीवरती उपाययोजना न आखल्यास भात शेतीच नव्हे तर खरीप हंगामातील बांधावरील शेती व रब्बी हंगामातील भाजीपाला, कडधान्य पिके घेणे शेतकऱ्यांना मोठे कठीण जाणार आहे. डहाणूची शेतीप्रधान तालुका अशी ओळख आहे. इथल्या लोकांचा उदरनिर्वाह हा शेती व्यवसायावरच होतो; मात्र या मोकाट जनावरांमुळे शेती व्यवसाय धोक्यात आला आहे.

Animals
Animal Care : जनावरांतील रेटीकुलम हर्नियावर उपचार तंत्र

यांत्रिकीकरणामुळे शेतीसाठी ट्रॅक्टर तसेच अन्य साधनाचा वापर होऊ लागला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातही शेतीसाठी जनावरांचा वापर कमी होऊ लागला आहे. तसेच जनावरांसाठी मजुरांची टंचाई भासू लागल्याने जनावरे पाळणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी होऊ लागली आहे. तसेच पावसाळ्यात मुबलक चारा उपलब्ध असल्याने अनेकजण गुरे मोकाट सोडतात.

यामुळे देखील शेतीचे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांच्या दावणीतून मुक्त झालेली जनावरे गावभर मोकाट फिरू लागली आहेत. शे- दीडशेच्या संख्येने गुरांचा कळप गावोगाव फिरू लागला. ही जनावरे रात्रीच्या वेळी शेतात पिकांचा फडशा पडतात. यामुळे शेतीचे नुकसान होते.

लिलाव पद्धतीला ग्रामस्थांचा विरोध

पूर्वी गावपातळीवरती कोंडवाडा पद्धत होती. शेतीत उपद्रव करणाऱ्या मोकाट जनावरांना पकडून ग्रामपंचायतीच्या कोंडवाड्यात गुरांना ठेवले जायचे. आठ दिवसाच्या मूळ मालक जनावरांना सोडवण्यासाठी आला नाही; तर जनावरांचा लिलाव करण्याची पद्धत होती.

मात्र या व्यवहारात भ्रष्टाचार होऊ लागल्यामुळे गावात लिलाव पद्धतीला विरोध होऊ लागला. लिलावात गावाबाहेरच्या व्यापाऱ्यांना गावातील लोकांनी प्रवेश नाकारल्याने हळूहळू कोंडवाडा पद्धतच मोडीत निघाली.

महामार्गावर अपघात

घोलवड येथून डहाणू कोसबाडमार्गे जाणाऱ्या रस्त्यावर प्लॉट पाडा, खेड पाडा, कोसबाड, वाकी, राईपाडा भागात मोकाट जनावरांचा सुळसुळाट आहे. त्यामुळे अनेकदा चालकांना वाहन चालवताना सावधानता बाळगावी लागते.

अनेकदा मोकाट जनावरांमुळे अपघात देखील होतात. मोकाट जनावरांचा प्रश्न बोर्डी ग्रामपंचायत पुरताच मर्यादित नसून डहाणू तालुक्यातील डहाणू नगर परिषदेसह ८५ ग्रामपंचायतीत भागांत जनावरांचा सुळसुळाट झाला आहे.

मोकाट गुरांवर आळा घालण्यासाठी डहाणू नगर परिषदेच्या माध्यमातून उपायोजना करण्यात आल्या आहेत. लवकरच अंमलबजावणी करण्यात येईल.

- वैभव आवारे, मुख्याधिकारी, डहाणू नगरपरिषद

आदिवासी अल्पभूधारक शेतकरी मोठ्या कष्टाने भातशेती करीत आहेत; मात्र मोकाट गुरांपासून पीक सुरक्षित ठेवणे ही शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

- विजय म्हात्रे, शेतकरी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com