Paddy Plantation : पालघरमध्ये भातलावणी अंतिम टप्प्यात

Paddy Farming : पालघर जिल्ह्यात एकूण ७६ हजार ६४४ हेक्टर क्षेत्रावर भात लागवड करण्यात येते. सध्याच्या परिस्थितीत पाऊस चांगला असल्याने जवळपास ९५ टक्के भातलावणीची कामे पूर्ण झाली आहेत.
Paddy Plantation
Paddy PlantationAgrowon
Published on
Updated on

Mumbai News : पालघर जिल्ह्यात एकूण ७६ हजार ६४४ हेक्टर क्षेत्रावर भात लागवड करण्यात येते. सध्याच्या परिस्थितीत पाऊस चांगला असल्याने जवळपास ९५ टक्के भातलावणीची कामे पूर्ण झाली आहेत. पुढील दोन दिवसांत शंभर टक्के कामे पूर्ण होतील, असा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.

खरीप हंगामात भातशेती ही निव्वळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे हे एकमेव उत्पन्नाचे साधन आहे. शेतीलायक पाऊस झाला नाही, तर संपूर्ण वर्षाचे गणित बिघडते. उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण, आरोग्याचा विचार करता यंदा शेतकऱ्यांना अनेकदा वरुणराजाकडे साकडे घालण्याची वेळ आली आहे.

Paddy Plantation
Paddy Plantation : खेडच्या पश्चिम पट्ट्यात भातलागवडी अंतिम टप्प्यात

जून महिन्यात पावसाने उशिराने हजेरी लावली. पाऊस नियमित सुरू होईल, या आशेने शेतकऱ्यांनी भातबियाण्यांची पेरणी केली; परंतु नंतर वरुणराजाने पाठ फिरवल्यामुळे समप्रमाणात बियाण्यांची उगवण झाली नाही. काही शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले. नंतरच्या कालावधीत जुलैअखेरीस मुसळधार पावसाने झोडपून काढले. भात लागवडीच्या प्रत्येक टप्प्यात पावसाचे संकट उभे राहिले आहे.

डहाणू तालुक्याचे एकूण ९८५३७.३८ हेक्टर भौगोलिक क्षेत्र आहे. त्यातील १५७४३.६० हेक्टर भात लागवड क्षेत्र आणि २३४.७५ हेक्टर क्षेत्रावर नागलीचे पीक घेतले जाते. यंदा ५० हेक्टर क्षेत्रावर यांत्रिकी आणि ५० हेक्टर क्षेत्रावर एसआरटी पद्धतीने; तर उर्वरित क्षेत्रावर पारंपरिक पद्धतीने भातलावणी करण्यात आली. पुढील काळात संपूर्ण डहाणू तालुका यांत्रिकीकरणाने समृद्ध करण्यात येणार आहे. कृषी विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी ‘शेतकऱ्यांच्या सेवार्थ’ या ब्रीद वाक्याला साजेस काम करत आहेत. भातलागवड क्षेत्र कमी होऊ नये आणि तरुणांना शेतीमध्ये काम करण्यास उत्साह निर्माण होणे गरजेचे आहे.
रवींद्र पाचपुते, तालुका कृषी अधिकारी, डहाणू
Paddy Plantation
Paddy Variety : कर्जतच्या प्रादेशिक कृषी संशोधन केंद्रातर्फे भाताचे तीन वाण विकसित
पाऊस चांगला पडत असल्याने भात लावणीची कामे पूर्ण झाली आहेत. परिसरात काही ठिकाणी पाच टक्के लावणीची कामे शिल्लक आहेत. पुढील दोन दिवसांत ती पूर्ण होण्याची शक्यता आहे. सध्या पावसाने उघडीप घेणे आवश्यक आहे. सततच्या पावसाने रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो.
यशवंत मेढा, प्रगतिशील शेतकरी, वाघाडी (डहाणू)

कृषी विभाग शेतकऱ्यांच्या मदतीसाठी

भातपिकाची विविध प्रात्यक्षिके

भात व नाचणी पिकासाठी शेतीशाळा

भातलागवडीनंतर येणाऱ्या कीडरोगाबाबत माहिती क्रॉपसॅपअंतर्गत नोंदवणे.

शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक यंत्रसामुग्री मिळवणेसाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्यास मदत करणे.

मजुरांची उपलब्धता

भातलावणीच्या पहिल्या टप्प्यात अल्पभूधारक शेतकऱ्यांनी भातलागवड पूर्ण केली आहे. त्यामुळे जास्त शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात मजूर मिळत आहे. मजुरांच्या उपलब्धतेमुळे भातलागवडीच्या कामांना गती मिळाल्याने लावणीच्या कामांना अंतिम स्वरूप प्राप्त होण्याची शक्यता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com