
Washim News : मंगरुळपीर तालुक्यातील वनोजा परिसरातसह जिल्ह्यात सध्या संत्रा उत्पादक शेतकरी पावसामुळे मोठ्या चिंतेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मॉन्सूनपूर्व पावसामुळे संत्र्याच्या मृग बहाराला मोठा फटका बसण्याची शक्यता तयार झाली आहे. शेतकऱ्यांनी मृग बहार घेण्यासाठी आपल्या बागांना ताणावर सोडले होते. मात्र, सततच्या पावसामुळे हे ताणचक्र बिघडले आहे.
संत्र्याला चांगला बहार येण्यासाठी झाडांना विश्रांती देऊन पाण्याचा ताण देणे अत्यंत महत्त्वाचे असते. साधारणपणे एप्रिल-मे महिन्यात शेतकरी बागेचे पाणी पूर्णतः बंद करतात किंवा जमिनीच्या प्रकारानुसार पाण्याचे नियोजन करतात.
यामुळे झाडांमध्ये अन्नद्रव्यांचा (कर्ब/नत्र) संचय होतो आणि जून-जुलैमध्ये पाऊस सुरू झाल्यावर चांगला बहार येत असतो. त्यानंतर फळधारणा होते. परंतु, यंदा मे महिन्यात होत असलेल्या पावसाने या संपूर्ण प्रक्रियेत अडथळे निर्माण केले आहेत.
लिंबूवर्गीय फळझाडांना बहर येण्यासाठी झाडाची वाढ करणारे अन्नद्रव्य वाढीसाठी खर्च न होता, त्याचा संचय होणे आवश्यक असते. अन्नद्रव्यांचा पुरेसा संचय झाल्यावर आणि पोषक हवामान मिळाल्यावरच बहाराची फुले दिसू लागतात.
पावसामुळे झाडांचा ताण तुटला गेल्याने मृग बहार फुटण्याची शक्यता आता खूपच कमी झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. आगामी काळात हवामानाची स्थिती कशी राहते, यावरच संत्रा उत्पादकांचे भवितव्य अवलंबून आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.