Manor News : आदिवासी विकास महामंडळाच्या आधारभूत भातखरेदी केंद्रांवर ऑनलाइन प्रणालीत तांत्रिक दोष निर्माण झाल्यामुळे आठवडाभरापासून बंद पडले आहे. शेतकऱ्यांना भातविक्रीसाठी खरेदी केंद्रांवर हेलपाटे मारावे लागत असल्याने आर्थिक भुर्दंड पडत असून गैरसोयीलाही सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे भात खरेदी तत्काळ सुरू करण्यात यावी, अशी मागणी कुणबी सेनेने केली आहे.
पालघर जिल्ह्यात भातशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना काही वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे नुकसान सोसावे लागत आहे. अवकाळी पाऊस आणि अन्य समस्यांवर मात करत पालघरच्या ग्रामीण भागातील शेतकरी भातशेती करून उत्पन्न घेतात. पिकवलेल्या भाताची विक्री करताना त्यांची गैरसोय होत आहे.
आदिवासी विकास महामंडळाच्या गलथान कारभारामुळे आधारभूत भातखरेदी केंद्रांवर विक्री करताना संघर्ष करावा लागत आहे. केंद्रांवर भाताची साठवणूक करण्यासाठी जागा नाही, बारदानाचा तुटवडा, खरेदीसाठी ऑनलाईन यंत्रणा ठप्प पडण्यासारख्या समस्यांमुळे शेतकरी हैराण झाले आहेत.
ऑनलाइन प्रणालीमध्ये तांत्रिक दोष निर्माण झाल्याने केंद्रांवर आठवडा भरापासून भातखरेदी बंद पडली आहे. भातविक्रीसाठी शेतकऱ्यांना हेलपाटे मारावे लागत आहे. यामुळे गैरसोय होत असून तत्काळ भात खरेदी सुरू करण्याची मागणी कुणबी सेनेने केली आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.